*चिंतनीय_लेख आहे, अजिबात राजकीय नाही, प्रत्येकाने आवर्जून वाचा...!!*
भारताची वाटचाल 👨🦯🧑🦯 निष्क्रिय भविष्याकडे....????
आपण कुठे चाललो आहोत...??
नुसतं राजकारण हे म्हणजे जीवन नाही...
आपल्या भारत देशाला जर बलशाली राष्ट्र बनवायचे असेल तर जरा वेगळ्या पद्धतीने विचार करणे आता आवश्यक आहे...
उठा...!! जागे व्हा...!!
आज बालवाडीपासूनच फुकटचा भात, अंडी, शिरा देउन बालमनापासूनच लाचारीची सुरुवात होते व पुढे तरूणपणी दहा रुपयांत जेवण १०० यूनिट्स मोफत, वीज फुकट, रेशन सरसकट,आवास योजनेंतर्गत निरर्थक सूट, ऊठसूठ कर्जमाफी ह्या गोष्टींची आशा लावून सध्याच्या आणि पूर्वीच्या ही सरकारने आणू घातलेल्या या योजना समाजाच्या मानसिकतेवर अतिशय घातक परिणाम करून जाणार आहेत...
देशात सध्या जवळपास ६७% लोकसंख्या तरुणांची हिच अवस्था आहे, हेच प्रमाणसंपुर्ण महाराष्ट्रात आहे...
ज्या वयात आपले भविष्य घडवण्यासाठी कष्ट करायला हवेत त्या वयातल्या तरुणाला महिना ६०० रुपये दिले की जेवण, मोफत वीज, सरसकट कर्जमाफी दिली जाते...
अशाने त्यांची विधायक क्रयशक्ती संपून जाणार आहे...
यामध्ये अजून एक भयंकर गोष्ट म्हणजे असे की गेल्या १० वर्षापासून इ. १ ली ते ८ वी पर्यंत परिक्षाच झालेली नाहीये....
९ वी साठी ही वर्गोन्नतीचे अलिखीत आदेश आहेत...त्यामुळे यापुढे तरूणपिढीचा भविष्यकाळ खूप कठिण असणार आहे...
ग्रामीण भाग असो किंवा शहरातील चौक बहुतांश ठिकाणी महागड़े Mobile, Bike, तोंडात गुटखा, अशी ही बहुतांश तरुणाई पार PM. कसा चुकीचा,CM. कसा चुकतो पासून गावातल्या फ्लेक्सवर आपला फोटो कोणत्या पोजमध्ये टाकायचा यासारख्या चर्चेत गुंतलेला असते...
आता हीच तरुणाई या फुकटचे दान वाटणाऱ्या राजकीय पक्षांच्या सतरंज्या उचलायला सहज उपलब्ध होते....
फुकट जेवण, फुकट वीज, थोडासा बेरोजगार भत्ता फुकट रेशन यामुळे एक अख्खी कर्तृत्ववान पिढी बरबाद होणार आहे....
आजच्या तरुणाकडे आशिष्ठः, द्रढिष्ठाः,बलिष्ठाः,ही सामर्थ्य असायला हवीत, हा तरुण धेयवादी असावा तरच तो या गोष्टींना लाथ मारील व मला फुकटचे नको असे सांगेल...
सगळेच फुकट अशी सवय लागली की पुढच्या सरकारकडून हीच त्यांची अपेक्षा देखील राहणार....
कोणतीही गोष्ट आकाशातून फुकट पड़त नसते, या साठी लागणारा निधी जे ५-६ टक्के करदाते आहेत ते व शेवटी ते शेतकऱ्यांच्या मुळावर महागाईचे रुपात येऊन पडते....
स्विट्झजरलैंडमध्ये ३-४ वर्षांपूर्वी सर्व नागरिकांना सरकारने तिजोरीत शिल्लक असलेली गलेलट्ठ रक्कम दरमहा फुकट देऊ केली होती...
तेव्हा ७७% लोकांनी आम्हाला फुकटचा पैसा नकों, आमची क्रयशक्ती कमी होईल असे सांगून याला विरोध केला...
आपल्याला स्विट्जरलैंडची सौंदर्य, सुबत्ता दिसते पण त्या मागे प्रत्येक नागरिकाची जिद्द कर्तव्यनिष्ठता आपण विसरतो...
आपल्याला जर खरच स्वतःला आणि भारत देशाला संपन्न करून प्रगति पथावर न्यायचे असेल तर सगळेच फुकट ही मानसिकता सोडा आणि अशी अफू देणाऱ्या व्यवस्थेला दूर करण्याचा निश्चय मी आज मनापासून करेल. सरकारने ही जीवनावश्यक वस्तू रास्त भावात द्यायलाच हव्यात....
अन्न फुकट पाहीजे...ते खाण्यासाठी पैसे नाहीत, ते सरकारने द्यावे...किमान आपण राहत असलेल्या आपल्या घराचे १०० Units चे लाईट बिल तरी भरायला हवे...ते भरण्यासाठी सुद्धा पैसे नाहीत....ते सुद्धा सरकारने भरावे...मग आपन जन्म कशासाठी घेतला आहे...??आपल्या पेक्षा मग पशु-पक्षी बरे...लाॕकडाऊनमध्ये प्राणी-पक्षांना सरकारने काय मोफत दिले...?? तरी त्यांनी चारा शोधलाच ना...!! ते जिवन जगलेच ना...
आणि आपण मनुष्य जन्माला आलो आहोत...कशासाठी...?? अशी अवस्था आज आपल्या देशात आहे...ईतर देशात कुठेही नाही...
मोबाईल, राजकारण, अतिरंजित मीडिया, जात या विळख्यातून मुक्त होण्यासाठी धड़पडणाऱ्या तरुणाईला ही फुकटची अफू निर्बल निष्क्रिय करण्याचा धोका होतो....
आणि मग यातूनच मग आपल्या संतानी म्हटल्या प्रमाणे 'रिकामे मन, सैतानाचे घर' यानुसार दुराचार बलात्कार, व्याभिचार, लुटमार वाढतात व राष्ट्राचे प्रगतीऐवजी यातून नुकसानच जास्त होते...
"आत्ताचे आपल्या पीढीचे सोडा हो...!! पन आपल्या येणाऱ्या पुढच्या पिढीचा सगळ्यांनी नक्कीच विचार करा..."
----------Whatsaap Collection ----------