देशातील नागरीक कोणत्याही
राज्यात स्वत:चे घरदार सोडून काम करतात, वर्षानुवर्ष कमाई करतात, व्हीसा शिवाय फिरायला
जातात, तर देशावर आलेल्या कोरोना च्या संकटावर मात करण्यास फक्त काही दिवस तेथे का
थांबू शकत नाहीत.
टाळेबंदी
कधी ना कधी तरी संपणारच आहे. मग संपल्यावर रोजगाराच्या शोधार्थ त्यांना येथे यावेच
लागेल ना !
कारख्यान्यात किंवा कंपनीत काम करतांना त्यांना
कोणत्या ना कोणत्या संकटांचा सामना कधी ना कधी तरी करावा लागलाच असेल ना ! मग……….
कारोना
सोबतची लढाई जिंकायची असल्यास असे कामगारांनी घाबरून चालनार नाही.
दुसरी कडे घरात बसून असलेली माणसे मात्र चिडचिडी
झालेली आहेत. कारण त्यांची रोजनिशी बदलली आहे. त्यांनी हया लॉकडाउनमूळे मिळालेल्या
कालावधीच्या संधीचे सोने केले पाहीजे. हा वेळ काही नविन शिकण्यासाठी वापरावा. त्यामूळे
त्यांचे मन रमेल व चिडचिड कमी होईल.


No comments:
Post a Comment