Tuesday, 14 September 2021

!!!!!मराठी तरुण आणि शेती !!!!! ब्लॉग वाचून झाल्यावर खाली दिलेल्या लिंकवर क्लिक करा, डाउनलोड करा आणि बघा संपूर्ण चित्रपट.....''मुळशी पॅटर्न''

 एक शाश्वत मनोगत........  ....True 


पैसा नाही कमवला तर पुढच्या पिढीकडे एक गुंठाही जमीन शिल्लक राहणार नाही...

 टप्पा १:- १९५० ते १९७५ 

या कालावधीत मराठी माणसाकडे गावाकडे भरपूर जमीन होती.

सरासरी प्रत्येक कुटुंब २०-३० एकर जमिनीचे मालक...

मोठे वाडे...

दांडगा रुबाब...

निसर्गावर चालणारी शेती...

अगदी १० वी-१२ वी शिकलेले शिक्षक, मिलिटरी भरती, पोलीस भरती झाले तसेच स्पर्धा परीक्षेत सहज यश मिळायचे.

अनेक पदवीधर PSI, Dy. SP , तहसीलदार त्या काळात झाले.

नाही जरी नोकरी लागली तर आहे की 20-30 एकर शेती...

उत्तम शेती, दुय्य्म नोकरी, तृतीय व्यापार अशी म्हण होती. हा काळ म्हणजे मराठी माणूस राजा होता.

 *टप्पा २ :- १९७५ ते १९९५ 

* देश उद्योग व आधुनिकतेकडे जाऊ लागला, १९७१/७२ च्या दुष्काळापासून निसर्गाने झटका द्यायला सुरुवात केली.

शेतीची विभागणी सुरु झाली, २० एकराचे मालक ५ एकरावर आले.

बाहेरील राज्यातील कामगारांचे मुंबई शहरात शिरकाव सुरु झाले.

शेती आता भांडवलदाराची होऊ लागली. विहिरी, मोटारी, पाईप लाईन आल्या.

पाणी उपसण्याची स्पर्धा सुरु झाली.

राजकारण गावागावात घुसलं, पुढारपणाच्या नादात अनेकांनी जमीनी कवडी मोलाने विकल्या, बाई-बाटलीत अनेकजण बरबाद झाले.

स्पर्धा वाढली, आता नोकरी सोपी राहिली नाही.

हायस्कुलवर नोकरीचा दर २० लाख झाला.

वाढणाऱ्या गरजेपोटी जमिनी विकायला सुरवात झाली.

२० एकराचा मालक मोकळा झाला व गावच्या कट्ट्यावर विड्या फुकू लागला, पोरं बेकार फिरू लागली.

 टप्पा ३ :- १९९५ -२००९ 

हा काळ मराठी माणसाच्या जबरदस्त घसरगुंडीचा काळ.

परराज्यातून मोठया प्रमाणात लोक आले.

मोठे उद्योग यांनी काबीज केले, हॉटेल शेट्टी लोक, दूध-पेपर-भाजीपाला-टॅक्सी-पाणीपुरी-किरकोळ दुकानदारी उत्तरेतील लोकांनी काबीज केली.

सहकारी कारखाने, बँका, पेट्रोल पम्प, बिअर बार, दारू दुकानें चाणाक्ष पुढाऱ्यांची झाली.

मराठी माणूस मात्र अजूनही विहीर पाडतो...

बोअर मारतो...

स्पर्धा परीक्षा तयारी...

भरतीला जातो...

पोराला हायस्कुल वर चिटकवतो...

ह्यातच गुंतलेला दिसला. २० एकर जमीन वाटण्या होऊन, मग विकून एकरावर आली तरी डोळे उघडतं नव्हते.

अजूनही पाटीलकी, व जमीनदारीच्या दिवा स्वप्नात रमला होता.

 टप्पा ४ :- २००९ ते २०२० 

ग्लोबलायझेशन झाले, जगाचे पैसे भारतात आले.

पुणे, मुंबई, इतर शहराजवळील जमिनींना किंमती आल्या.

मग काय?

जमिनी विकायची स्पर्धाच सुरु झाली.

राजकीय कार्यकर्ते एजंट झाले व मराठी माणसाचा 'मुळशी पॅटर्न' झाला.

जमीनदारी संपली...

पोरं बेकार...

पुणे-मुंबईत ८ - १० हजारांच्या नोकऱ्या करू लागली.

आता विकायलाही काही शिल्लक राहिलं नाही.

खरी, बिकट गरिबी सुरु झाली.

पोरांचा वापर शंभर-दोनशे देऊन राजकारणात सुरु झाला.

बापाकडे लग्नाला पैसा नाही.

मग पोरी हात धरून पळून जाऊ लागल्या.

गावचा जमीनदार हमाली करू लागला.

व्यापार तृतीय म्हणायचे. त्यांचेकडेच हे बडे जमीनदार, त्यांची पोरं वॉचमन, हमाली, क्लार्क, ड्रायव्हर अश्या नोकऱ्या करू लागली व.....

जयंती साजरी करणेसाठी बड्या व्यापारी लोकांजवळ वर्गणी मागू लागली..

 *टप्पा ५ :- २०२० ते *२०30 

इथून पुढील काळ फक्त पैश्याचा असेल. ज्यांचेकडे पैसा तोच सरपंच, तोच आमदार...

नोकरी हा विषय संपला आहे!!!!

नोकरी शोधणारा त्यातच म्हातारा होईल.

उच्च जातीचा हताश होऊन बघत बसेल.

पैसा न कामविणाऱ्याकडे एक गुंठासुद्धा शिल्लक राहणार नाही.

शेती, नोकरीसह जो व्यवसाय करेल तोच काही कमवू शकेल.

म्हणून मराठी तरुणांना विनंती आहे अजून वेळ गेली नाही शेती सांभाळा शेती बरोबर जोडधंदे करा , नोकरी पेक्षा व्यवसाय करण्याचा विचार करा.....

जो चूक करतो तो माणूस...

तीच तीच चूक परत करतो तो वेडा माणूस...

जो दुसऱ्याच्या चुकापासून शिकतो तो शहाणा माणूस...

आता वेळ आहे झालेल्या चुका सुधारून त्या चूक पुन्हा होणार नाहीत हे पहा.... तर चला मग शाश्वत विकासाची साथ धरा, *


!!!!!मराठी तरुण आणि शेती !!!!!

खालील  ''मुळशी पॅटर्न''  वर क्लिक करा, डाउनलोड करा आणि बघा संपूर्ण चित्रपट 

मुळशी पॅटर्न 





"बाप हाच बापमाणुस असतो..."

 *सदर लेख खुप छान आहे.सर्वांनी वाचा आणि आपल्या पत्नीला देखील वाचायला द्या.*

 🚹  बाप कि बापडा ?  🚹

        ==========


    स्त्री तरुण झाली की आईबापाची साथ सोडते आणि पतीचा हात धरते. पस्तीशी चाळीशीपर्यंत ती नवऱ्याचं सर्वच ऐकते!! "मग तो चांगला असो की वाईट, सज्जन असो की दुर्जन, व्यसनी असो की ठसनी !"

    

👉जशी मुलं तरुण होतात तशी ती मुलांकडे वळते, त्यांच्या भावना समजून घेते, त्यांचे वाट्टेल ते लाड पुरविते, जे पाहीजे ते मुलांना खायला देते, नवऱ्याच्या चोरून मूलांना पैसे पुरविते, साहजिकच मुलं उत्पत्ती पासूनच आईच्या उदरांत, व जन्मापासून तिच्या सहवासात असतात.

☹️   बऱ्यांच परिवारात मुलं तरुण झाली, की बापाशी बोलत नाहीत.!!!


    त्यांना जे मागायचं ते आईकरवी वडिलांना निरोप पुरवितात, आईशी मनमोकळे पणाने बोलतात, तिला न हिचकिचता मनातील सर्व चांगल्या वाईट गोष्टी सांगून टाकतात. काही माताच मुलांच्या या सर्व गोष्टी आपल्या पतींना सांगतात. पण "जास्तीत जास्त महिला यापासून पतींना दूर ठेवतात." मुलांच्या वाईट सवयी व झालेल्या छोट्या मोठ्या चूका लपवितात, त्यावर पडदा टाकतात आणि मुलं मग भरकटतात, बिघडतात...!!


🥰   आईचं मुलावर नितांत प्रेम असावं पण ते आंधळं प्रेम असू नये. की ज्या प्रेमाने मुलांचं आयुष्य निकृष्ट (बर्बाद)  🥰  होईल.


     मुलं वीस वर्षाची झाली की, आईला फार मोठेपणा वाटतो मुलांचा ! आणि ते साहजिक आहे ! पण या कौतुका समवेत त्या आपल्या पतीकडे दुर्लक्ष करतात. ते काही बोलले तर मधेच बोलून त्यांचे शब्द, त्यांचे बोलणे थांबवतात. मग मुलांवर बापाचा वचक राहत नाही.


मुलांना आई चांगली वाटते अन् बाप वैरी वाटायला लागतो.


 🗣️  "वास्तविक कोणताच बाप मुलांचा वैरी नसतो..!! मुलांना व्यवहार कळावा, ते धैर्यशाली, नितीवान, शिलवान, बलवान बनावे. चांगल्या लोकांमधे उठावे बसावे, सर्वाचा त्यांनी मानसन्मान करावा अशा कितीतरी मानवी जिवन जगण्याच्या गोष्टी त्यांनीअचूकपणे कराव्या, यासाठी बाप मुलांना सतत रागावत असतो, टोकत असतो, मुलांना शिस्त लागावी हा त्याचा प्रामाणिक हेतूअसतो, मुलाच्या हातून काही चूकीचं घडू नये असं बापाला वाटते"  म्हणून तोआपल्या मुलांचे फालतू लाड करीत नाही. पण याचा कुठेच सकारात्मक विचार होत नाही. 🥸


"बापाचे गोडवे कुठेच गायले जात नाहीत"


"अशा परिस्थितीत माणूस खिन्न होतो, त्याच्या मनातील भावना पत्नी समजून घेत नाही."


   ती असं कधीच म्हणणार नाही की, "बाळा, तुझे वडील तुला तुझ्या भल्यासाठीच बोलतात, रागावतात. ते तुझ्या अभ्यासासाठीच तुला बोलतात, तुझ्या भल्यासाठीच सगळं करतात. ते तुला बोलतात पण त्यांचं तुझ्यावर प्रेम नाही असं तर होत नाही ना  ?"


उलट, अनेक आई म्हणतात  (मुलांच्या समोरच ) "बस करा, तुम्हाला माझी मुलंच दिसतात का नेहमी बोलायला?  घरात आले की सुरु होतात, तुम्हाला तर काहीच कळत नाही, मुलं मोठी झाली आता, त्यांचे मित्र बनायला पाहिजे तुम्ही, पण नाही..! लेकरांत जिवच नाही ना तुमचा ! कधीतरी प्रेमानं बोललेत का तुम्ही त्यांच्याशी...!!"


 अशाप्रकारे, आई नवऱ्याचा, मुलांसमोर पाणउतारा करते आणि "मीच तुला समजून घेते, मीच तुझ्यावर अलोट प्रेम करते, मीच सर्व काही करते," असा मात्रुत्वाच्या प्रेमाचा व श्रेष्ठत्वाचा आव आणते.!!


साहजिकच असे सतत 🔨'हँमरिंग' होऊन मुलं बापापासून दूर जातात.!!


म्हणून "वेळेचं भान ठेवा ! प्रपंच ही फार समजून उमजून करायची गोष्ट आहे"


"मुलांना सुसंस्कार देणे हे आईचेच काम आहे, पण त्यांना घडवतांना बापाचाही सहभाग आणि धाक असायलाच हवा !! हे कायम लक्षात ठेवा.!!" 


"लहानपणी बापाचा हात धरला, तर मोठेपणी कोणाचेही पाय धरायची वेळ येत नाही !!!!!!" 


"बाप  हाच बापमाणुस असतो..."


 "त्याला कृपया बापडा बनवु नका. !!!!!"

   ======= + =======


बाप आपल्यासाठी कसा तळमळीने वागतो व किती प्रेम करतो हे जाणून घेण्यासाठी आपल्या जीवनात एकदा "मी आणि माझा बाप"  हे "डॉ.  नरेंद्र जाधव" यांनी लिहिलेलं आत्मचरित्र अवश्य वाचा हा लेख वरील पुस्तकावर आधारित आहे.

🌸 वाचुन चांगले वाटले तर, आपल्या शेजारी राहणाऱ्यांना वाचायला द्या.कदाचित सुधारणा होईल. 🌸

🙏🌹🙏🌹🙏🌹🙏


-------  Whatsap Collection -------

Wednesday, 1 September 2021

शाळांना मिळणार 8 टक्के वेतनेत्तर अनुदान, शासनाकडून इतक्या कोटींची तरतूद…

 शाळांना पाच टक्के ऐवजी सात ते आठ टक्के वेतनेतर अनुदान मिळणार

औरंगाबादः मागील तीन वर्षापासून खासगी शिक्षण संस्थांच्या शाळांना शासनाने वेतनेत्तर अनुदान दिलं नाही. याबाबत शिक्षण संस्था महामंडळाने मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठात याचिका दाखल केली होती. यावर खंडपीठाने निर्णय देवून शिक्षण विभागाने त्वरीत शाळांना प्रचलित आयोगानुसार अनुदान देण्याचे निर्देश दिले असल्याची माहिती मा. केंद्रीयमंत्री विजय नवल पाटील यांनी दिली.

महाराष्ट्र शासनाने गेल्या तीन वर्षापासून खाजगी शिक्षण संस्थाच्या शाळांना एक रुपयाही वेतनेतर अनुदान दिलं नव्हतं. त्यामुळे महाराष्ट्र राज्य खाजगी शिक्षण संस्था महामंडळाचे अध्यक्ष विजय नवल पाटील यांनी ही मागणी वेळोवेळी लावून धरली होती. नुकतीच नवलपाटील यांच्या अध्यक्षतेखाली शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांच्या उपस्थितीत महामंडळाचे पदाधिकारी अशोक थोरात, रवींद्र फडवणीस, विजय गव्हाणे, गणपतराव बालवडकर, एस. पी. जवळकर, वाल्मीक सुरासे, आ. किरण सरनाईक, आ. सुधीर तांबे, आ. विक्रम काळे यांच्या उपस्थितीत विविध मागण्यांसाठी बैठक आयोजित केली होती.

महाराष्ट्र राज्य शिक्षण संस्था महामंडळाने प्रचलित त्या-त्या वेतन आयोगानुसार वेतनेतर अनुदान द्यावे, अशी मागणी करणारी याचिका मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठामध्ये दाखल केली होती. त्यानुसार खंडपीठाने निर्णय देऊन राज्य शासनाच्या शिक्षण विभागाने त्वरित शाळांना प्रचलित आयोगानुसार(७ सातव्या) वेतनेतर अनुदान द्यावे, असे निर्देश दिले होते. यासाठी रवींद्र फडवणीस यांनी कोर्टात पाठपुरावा करून शासनाने कोर्टाच्या निर्णयाला दिरंगाई केल्यामुळे शिक्षण विभागाच्या विरोधात अवमान याचिका दाखल केली होती. यामुळे शासनाने तात्काळ २३७ कोटी रुपये वेतनेतर अनुदानासाठी मंजूर केले. त्याचा पहिला हप्ता त्वरित शिक्षण आयुक्त यांच्याकडे वर्ग केला आहे.

शाळांना पाच टक्के ऐवजी सात ते आठ टक्के वेतनेतर अनुदान मिळणार आहे. कोरोना महामारीत शाळांच्या खर्चाला ही रक्कम उपयोगी पडणार आहे. यासाठी राज्यातील सर्व पदाधिकाऱ्यांनी पुढाकार घेतलेला होता.
महामंडळाचे अध्यक्ष विजय नवल पाटील यांनी वेतनेतर अनुदानासोबत शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी भरती, विनाअनुदानित शाळेवर व कनिष्ठ महाविद्यालयात काम करणाऱ्या शिक्षकांना त्वरित वेतन अनुदान द्यावे, अशी मागणीही शिक्षणमंत्री व अर्थमंत्र्यांकडे केली.


कोर्टाच्या निर्णयामुळे शासनाला वेतनेतर अनुदान देणे भाग पडले. याबद्दल महामंडळाच्या सर्व पदाधिकाऱ्यांनी समाधान व्यक्त केले. उर्वरित मागण्या मंजूर करून घेण्यासाठी राज्यातील सर्व संस्थाचालकांनी एकत्रित येऊन संघटना बळकट करून लढा द्यावा, असे आव्हान राज्य सरकार्यवाह मा. आ. विजय गव्हाणे, वसंत घुईखेडकर, रावसाहेब पाटील, शिवाजीराव माळकर सुक्रे, रामदास पवार, मनोज पाटील, अजित वडगावकर यांनी केले.