Thursday, 29 July 2021

सन २०२०-२०२१ च्या डी.सी.पी.एस. पावत्यां ब्लॉग मध्ये दिलेल्या लिंक वर क्लिक करून चेक करा.

 


सध्या पे युनिट चंद्रपूर येथे सन २०१२-२०१३ पासून सन २०२०-२०२१ पर्यंतच्या  डी.सी.पी.एस. पावत्यांचा ताळमेळ (हिशोब) जुळविणे सुरु आहे. त्या करीता लिपिक वर्गाला थोडी मदत म्हणून सन २०२०-२०२१ च्या डी.सी.पी.एस. पावत्यां चेक करण्याकरिता खाली एक्सएल शीटची लिंक देत आहो. 

त्यावर क्लिक करून एक्सेल शीट डाउनलोड करा व त्यातील पिवळ्या सेल मधील माहिती भरून सन २०२०-२०२१ च्या डी.सी.पी.एस. पावत्यां चेक करा. 



LINK         ->      2020-2021 DCPS Reciepts



(टीप :- सदरच्या लिंक मधील डाउनलोड केलेली एक्सेल शीट ही पे युनिट चंद्रपूर यांनी प्रकाशित केलेली नसून, स्वतः फॉर्मुले लावून बनविलेली आहे, त्यामुळे एक्सेल शीट ही पे युनिट चंद्रपूर यांचे कडून ग्राह्य धरण्यात येणार नाही. कोणीही त्याची प्रिंट घेतल्यास त्यास ते स्वतःच जबाबदार असतील. सदरच्या एक्सेल शीट मधील आलेले रिझल्ट हे बरोबरच असतील असे नाही. पण जवळपास रिझल्ट आणण्याचा हा माझा प्रयत्न आहे. )



आपल्या काही सूचना असल्यास कृपया कॉमेंट बॉक्स मध्ये द्याव्यात. 

आपल्या सूचना स्वागतार्ह्य आहेत. 




Monday, 19 July 2021

पद आणि कर्तव्य.

 *पद* 

कोणत्याही माणसाचे महत्व *पद* मिळाल्यामुळे कधीच वाढत नाही, तो किती कार्यक्षम, कर्तृत्व,नेतृत्व दाखवतो...  यावरच त्याचे खरे व्यक्तीमत्व समाजाला समजते, कर्तृत्वच नसेल आणि *पद* मिळाल्यामुळे अहंपणा, स्वार्थपणा,लबाडी व गर्व चढला असेल तर कालांतराने निश्चितच त्याचा गर्व खाली होतो.


*पदामुळे* तात्पुरते महत्व वाढते, पण चांगल्या कर्तृत्वामुळे आयुष्यभर महत्व राहते. 


*पदामुळे* आपल्यावर असलेली जबाबदारी व्यवस्थित  वेळ देऊन पार पाडली पाहिजे, चांगली माणसं बरोबर घेऊन त्या क्षेत्रात यश मिळवले पाहिजे,ज्यांनी तुमच्यासाठी त्याग केला आहे, त्यांची जाणीव कायमच ठेवली पाहिजे, 


*पद* कधी तरी जाणारच असते, पण पद गेल्यावरही आपली किंमत कायम राहिली पाहिजे असे माणसांशी वागले पाहिजे 

नाहीतर हाच समाज तुमची कार्यक्षमता,कर्तृत्व,वागणं, प्रामाणिकता व बोलणं पाहत असतो,ऐकत असतो आणि सहनही करत असताे,मात्र लबाडीसह स्वार्थीपणा वाढला तर योग्य वेळ आल्यावर तुमची किंमत रसातळाला जाऊन शून्य होते.


*म्हणूनच आपल्या माणसांशी, समाजाशी व विश्वासू मित्रांशी,  नीट वागा,नीट बोला व आपले कर्तृत्व निस्वार्थी व चांगले आहे हे काम करून सिध्द करा, तरच लोक तुमच्या सोबत राहतील...!*       


*संघटना व संघटित कार्यकर्ते यांना समर्पित* 


*रस्ता चुकणं चुकीचं नसतं, मात्र रस्ता चुकत  आहे हे समजून पण त्याच रस्त्याने चालत राहणे नक्कीच चुकीचं असतं...

*🙏🏻🤝🏻🙏🏻🤝🏻🙏🏻🤝🏻🙏🏻*

व्हाटसॅप कलेक्शन......... 


Sunday, 18 July 2021

*कौतूकाची थाप कुठेच कमी पडायला नको*



यावर्षीचा दहावीचा रिझल्ट लागला आणि पहिल्यांदाच करोनाच्या कृपेने एका अनोख्या रिझल्टला विद्यार्थी आणि पालक सामोरे जात आहेत. परीक्षा न घेताच फक्त अंतर्गत मूल्यमापनानुसार हा निकाल लावला गेला आहे त्यामुळे या निकालाला एक ऐतिहासिक महत्व प्राप्त झाले आहे. 

परिक्षा न घेताच निकाल घोषित झाल्यामुळे या निकालाला काहिसे थट्टेचे स्वरूप प्राप्त झाले आहे. कोविड बॅच, लॉटरी रिझल्ट, मार्कांची खैरात, बिनविरोध पास अशी शेरेबाजी सुरू झाली आहे. Whatsapp वर अशा अनेक मीम्स, वात्रट  विनोद यांचा भडीमार होत आहे.  या शर्यतीत लंगड्या घोड्यांनीही बाजी मारलेय त्यामूळे पेढे वगैरे वाटून, कौतुक करण्यासारखे विशेष काहि नाहि अशी कुजकट बोलणी करणारेही काहि महाभाग आहेत. अशावेळी ज्यांनी करोनाच्या या महासंकटात, अत्यंत विपरीत परिस्थितीत, भांबावलेल्या मनस्थितीत, आयुष्यातील एका महत्त्वाच्या परिक्षेचा अगदि जीव तोडून अभ्यास केला आहे त्या प्रामाणिक कोवळ्या मनांवर अशाप्रकारे खिल्ली उडवून आघात करणे योग्य नाहि याची जाणीव सर्वांनी ठेवायला हवी. 

       करोनाच्या या महाभयंकर संकटाला आपला देश आणि सर्व जग पहिल्यांदाच सामोरे जात आहे. कित्येक गोष्टी या test and trial basis वर केल्या जात आहेत कारण या अशा विपरीत परिस्थितीत नेमक्या काय योजना आखाव्यात, कशा प्रकारचे नियोजन करावे याचा पुर्वानुभव कोणालाच नव्हता  त्यामुळे प्राप्त परिस्थितीत सरकारने हा जो काहि निर्णय शालांत परिक्षेच्या बाबतीत घेतला आहे तो योग्यच म्हणायला हवाय. दुसरा काहि पर्यायच नव्हता. मुलांच्या सुरक्षेला प्राधान्य देणे अगदि योग्यच आहे. 

इकडे आड तिकडे विहिर अशी परिस्थिती सर्वांचीच होती. दहावी - बारावी सारख्या महत्त्वाच्या वर्षात करोनाचे महासंकट उभे राहिले होते. घराच्या बाहेर पडणे मुश्किल झाले होते. शाळा अनिश्चित काळासाठी बंद झाल्या होत्या. परीक्षा नेमक्या कशा घेतल्या जातील याची काहिच पुर्वकल्पना विद्यार्थ्यांना आणि पालकांना तसेच शिक्षकांनासुद्धा नव्हती. सर्वच गोंधळाचे वातावरण होते. online अभ्यासात अनंत अडचणी होत्या. शेवटि प्रत्यक्ष वर्गात बसून, शिक्षकांच्या मार्गदर्शनाखाली आणि सहकारी मित्रांच्या सहवासात केलेला अभ्यास आणि घराच्या एका कोपऱ्यात बसून मोबाईलच्या छोट्याशा स्क्रीनवर यापूर्वी कधिही न अनुभवलेला असा अभ्यास यामध्ये खूपच फरक आहे. या अभ्यासाला सरावण्यासाठीच मुलांना काहि काळ लागला. या महत्वपूर्ण परिक्षेत उत्तम गुण मिळविण्याचे दडपण मुलांवर असतेच त्यात हि अशी विपरीत परिस्थिती.... अशावेळी मुलांची मानसिक स्थिती काय असावी याचा अंदाज न केलेलाच बरा. शहरातील मुलांना तरी त्यातल्या त्यात बऱ्यापैकी सुविधा उपलब्ध असतात पण गाव खेड्यातील मुलांच्या अभ्यासाची तर पार दैना उडाली आहे पण दोष तरी कोणाला द्यायचा ?  काहि अपवाद वगळले तर बरेचसे विद्यार्थी प्रामाणिक प्रयत्न करत होते. शिक्षकांचे प्रत्यक्ष मार्गदर्शन मिळवण्यात अडचणी असल्याने यूट्यूबवर उपलब्ध असलेल्या काही शैक्षणिक सुविधांचा पर्याय शोधला जात होता. जमेल त्याप्रकारे विषय समजून घेण्यासाठी प्रयत्न केले जात होते कारण कुठल्याही स्वरूपात परीक्षा होणारच हिच धारणा होती. त्यासाठी जीव तोडून अभ्यास केला जात होता. शाळांमधून घेतल्या जाणाऱ्या विविध अंतर्गत चाचण्यांना प्रामाणिकपणे सामोरे जावे लागत होते. त्यामुळे मुलांच्या या प्रामाणिक प्रयत्नांना, मेहनतीला दाद द्यावीच लागेल. परीक्षा घेतल्या जाणार नाहित हा निर्णय अगदि शेवटी घेतला गेला होता त्यामुळे मुलांनी आता मिळवलेले गुण हे फुकटचे आहेत असे कोणीहि म्हणू नये. या वर्षातील त्यांची मानसिक स्थितीसुद्धा लक्षात घ्यावी. काहि दुर्दैवी मुलांनी तर जॉब घालवून घरात बसलेले बाबा, कोविड सेंटरमध्ये १५ दिवस विलगीकरणात गेलेले पालक, जवळचे  गमावलेले नातेवाईक असे आघातसुद्धा सहन केले होते. 

      अशा एकूण परिस्थितीत सर्व यशस्वी विद्यार्थ्यांचे कौतूक केलेच पाहिजे. नेहमीप्रमाणे प्रत्येक विद्यार्थ्यांचे योग्य मुल्यमापन कदाचित झाले नसेलहि परंतु या मिळवलेल्या गुणांचे महत्व त्यामुळे कमी होत नाहि. काहींना अपेक्षेहून जास्त तर काहि प्रामाणिक कष्ट केलेल्या मुलांवर अन्यायसुद्धा झाला असेल पण प्राप्त परिस्थितीत दूसरा कोणता ईलाजहि नाहि हे सुद्धा समजून घेतले पाहिजे. या कोवळ्या मनांना उभारी देण्याचे काम आपणच करायला हवे. त्यांच्या मनात कोणताहि प्रकारचा न्यूनगंड निर्माण होणार नाहि याची काळजी आपण घेतली पाहिजे. त्यांच्या पुढील यशस्वी कारकिर्दीसाठी त्यांना शुभेच्छा द्यायला पाहिजे. कौतूकाचा पेढा त्यांच्या तोंडात भरवलाच पाहिजे आणि त्यांच्या पाठीवर पडणारी कौतुकाची थाप कुठेही कमी पडणार नाहि याची काळजी सुद्धा घ्यायलाच पाहिजे. 

----WHATSAPP COLLECTION----

👍💐

Friday, 9 July 2021

सकारात्मक ऊर्जा ।

 एक राजा के पास कई हाथी थे, 

लेकिन एक हाथी बहुत शक्तिशाली था, बहुत आज्ञाकारी,समझदार व युद्ध-कौशल में निपुण था। 

बहुत से युद्धों में वह भेजा गया था और वह राजा को विजय दिलाकर ही वापस लौटता था....

इसलिए वह महाराज का सबसे प्रिय हाथी था। 


समय गुजरता गया  ..


और एक समय ऐसा भी आया, जब वह वृद्ध दिखने लगा।


                     

 अब वह पहले की तरह कार्य नहीं कर पाता था।

इसलिए अब राजा उसे युद्ध क्षेत्र में भी नहीं भेजते थे।


 एक दिन वह सरोवर में जल पीने के लिए गया, लेकिन वहीं कीचड़ में उसका पैर धँस गया और फिर धँसता ही चला गया। 


उस हाथी ने बहुत कोशिश की, लेकिन वह उस कीचड़ से स्वयं को नहीं निकाल पाया।


 उसकी चिंघाड़ने की आवाज से लोगों को यह पता चल गया कि वह हाथी संकट में है।


हाथी के फँसने का समाचार राजा तक भी पहुँचा।

 

                       राजा समेत सभी लोग हाथी के आसपास ईकट्ठे हो गए और विभिन्न प्रकार के प्रयत्न उसे निकालने के लिए करने लगे।


लेकिन बहुत देर तक प्रयास करने के उपरांत कोई मार्ग नहीं निकला..


तभी गौतम बुद्ध मार्गभ्रमण कर रहे थे। राजा और सारा मंत्रीमंडल तथागत गौतम बुद्ध के पास गये और अनुरोध किया कि आप हमें इस विकट परिस्थिति में मार्गदर्शन करें गौतम बुद्ध ने सबसे पहले घटनास्थल का निरीक्षण किया और फिर राजा को सुझाव दिया कि सरोवर के चारों और युद्ध के नगाड़े बजाए जाएँ।


सुनने वालों को विचित्र लगा कि भला नगाड़े बजाने से वह फँसा हुआ हाथी बाहर कैसे निकलेगा। जैसे ही युद्ध के नगाड़े बजने प्रारंभ हुए, वैसे ही उस मृतप्राय हाथी के हाव-भाव में परिवर्तन आने लगा। 


पहले तो वह धीरे-धीरे करके खड़ा हुआ और फिर सबको हतप्रभ करते हुए स्वयं ही कीचड़ से बाहर निकल आया।

गौतम बुद्ध ने सबको स्पष्ट किया कि हाथी की शारीरिक क्षमता में कमी नहीं थी, आवश्यकता मात्र उसके अंदर उत्साह के संचार करने की थी।


जीवन में उत्साह बनाए रखने के लिए आवश्यक है कि मनुष्य सकारात्मक चिंतन बनाए रखें और निराशा को हावी न होने दें...

 कभी – कभी निरंतर मिलने वाली असफलताओं से व्यक्ति यह मान लेता है कि अब वह पहले की तरह कार्य नहीं कर सकता, लेकिन यह पूर्ण सच नहीं है.....

 

 "सकारात्मक सोच ही आदमी को "आदमी" बनाती है....

उसे अपनी मंजिल  तक ले जाती है...।।


 आप हमेशा सकारात्मक ऊर्जा से परिपूर्ण , स्वस्थ एवं प्रसन्न रहें...।। 

------------     Whatsaap Collection   ------------

Thursday, 1 July 2021

भारतीय राजकारणी.

 ५४५  खासदार 

२४५  राज्य सभा खासदार

४१२०  देशातील आमदार


यांनी प्रत्येकी ५ लाख रुपये जरी दिले तर  २,४५५,०००,०००, लाख

२ अरब  ४५  कोटी ५० लाख रुपये जमा होतील


यात आजी - माजी  खासदार आमदार हे जर पुढे आले तर

भारतीय अर्थ व्यवस्था पण मजबुत होईल 

 

आता वेळ या राजकारणी लोकांची आहे, जनतेसाठी कोण कोण पुढे येतं हे पाहण्याची

निवडणूकीत करोडो लाखो खर्च करणारे जनते साठी पुढे या 

       

अशी विनंती भारतीय नागरीक म्हणून  करीत आहे.

          

मी हा मेसेज माझ्या सर्व ग्रुपवर टाकला आहे. 


 जर ह्या सर्व लोकांनी होकार दिला तर आपण सर्व आम जनता आपापल्या परीने देशासाठी नक्कीच मदत करील आता अजिबात शंका नाही.


सर्वात पहिली शरद पवार साहेबांनीआपल्या पासून सुरुवात करावी. मग उद्धव साहेबांनी सर्वांना आदेश द्यावा की महाराष्ट्रातील सर्व आजि माजी विधानसभा व राज्यसभा सदस्यांनी प्रत्येकी 5 लाख रुपये CM फंडात जमा करावे. मग बघा अवघा महाराष्ट्र कसा पुढे येतो ते... सुरुवात महाराष्ट्राने करावी.




आमदार खासदार चे लाड बंद करण्यासाठी सर्वोच्च न्यायालयात एक पीआयएल दाखल केला आहे, तो आपल्या मूल्यांकनासाठी पाठवित आहे ....

प्रिय भारताचे सन्मानिय  नागरिक बंधु-भगिनींनो ...

आपणास हा संदेश वाचण्याची विनंती केली गेली आहे. आणि आपण सहमत असल्यास, कृपया आपल्या संपर्कातील सर्व लोकांना पाठवा आणि त्यानंतर त्या प्रत्येकास पुढे पाठवण्याची विनंती करावी.........,. तीन दिवसांत हा संदेश संपूर्ण भारत भर पसरला पाहिजे, प्रत्येक नागरिकाने आवाज उठवावा,__

01) सर्व आमदार, खासदारांना पेंशन मिळू नये. कारण राजकारण म्हणजे नोकरी नाही. त्यामुळे नोकरी नाही तर वेतन नाही. राजकारण हे लोक प्रतिनिधित्व कायद्याअंतर्गत एक निवडणूक प्रक्रियेचा भाग आहे, त्याच्या सदस्यत्वास कोणतीही सेवा निवृत्ती नाही, परंतु सध्या त्यांना 5 वर्षांच्या सदस्य परानंतर पेन्शन मिळते. यात आणखी एक मोठा गोंधळ असा आहे की जर एखादी व्यक्ती कौन्सिलर असेल तर मग तो विधायक बनतो आणि नंतर सदस्य बनतो, त्याला तीन-तीन पेन्शन मिळते पण सामान्य माणूस दोन ठिकाणी नोकरीही करू शकत नाही, देशाच्या नागरिकांशी हा एक मोठा विश्वासघात आहे त्यामुळे त्यांची पेन्शन त्वरित बंद करावी . 

02) सेंट्रल पे कमिशन ने, भारतीय संसदेच्या आमदार खासदारांचा भत्ता सुधारित करावा. पण ते नौकर नसल्याने त्यांचे वेतन बंद करावे . (सध्या ते स्वत: साठी मत मागतात स्वत:चे वेतन आणि भत्ते वाढवतात आणि त्या वेळी सर्व पक्षांच्या सदस्यांचे स्वर एकत्र येतात ,हे विशेष,. 

03) खासदारांनी त्यांच्या सध्याच्या आरोग्य सेवा सुविधा नाकारून भारतीय सार्वजनिक आरोग्य सेवेचां लाभ घ्यावा. आपल्या व्याधीवरील उपचार भारतात  केले जावे . विदेशात उपचार केले जाऊ नये, जर करायचेच झाले तर ते आपल्या स्वतःच्या खर्चाने करावे . 

4) मोफत सवलत, राशन, वीज, पाणी, फोन बिल सहित सर्व सेवांची समाप्ती केली पाहिजे. (त्यांना इतक्या सवलती कायद्याने मिळत नाहीत)

05) गुन्हेगार नेत्यांना निवडणूक लढण्यापासून बंदी असावी. संदिग्ध व्यक्तींकडे दंडनीय, गुन्हेगारी शुल्क आणि दृढनिश्चय, गुन्हेगारी रेकॉर्ड किंवा भूतकाळातील त्यांना झालेला दंड विचारात घेवून अशा सदस्यांवर बंदी घालणे आवश्यक आहे.  राजकारण्यांकडून आर्थिक नुकसान झाल्यास त्यांच्या कडून व त्यांच्या कुटुंबियांकडून, तसेच नामनिर्देशित व्यक्तींकडून त्याची भरपाई केली पाहिजे. 

06) खासदारांनी सामान्य भारतीय लोकांना लागू असलेल्या सर्व कायद्यांचे देखील पालन करावे. * 

07) संसद कँन्टीनमध्ये मिळणाऱ्या जेवणात सवलत देऊ नये,संसदेत लोकप्रतिनिधी या नात्याने स्थान आहे, लुटालुटी साठी आकर्षक करिअर नाही.

08) विनामूल्य रेल्वे आणि विमान प्रवास बंद करावा.

9) नेते मरे पर्यंत खुर्चीला चिकटून राहणार, आणि सामान्य माणूस वयाच्या ५८ किंवा ६० व्या वर्षी सेवानिवृत्त होणार? ह्याचीं बुध्दी वयोवृद्ध होऊन ही तल्लख रहाते आणि सामान्य माणूस कामाच्याही लायक रहात नाही? जर प्रत्येक व्यक्तीने कमीत कमी वीस लोकांना हा संदेश फॉरवर्ड केला तर भारतातील बहुतेक लोकांना हा संदेश पोहोचण्यासाठी फक्त तीन दिवस लागतील.आपणास असे वाटत नाही की, हा मुद्दा उठवण्याची ही योग्य वेळ आहे? जनतेच्या कामासाठी शासना कडे पैसा नसतो आणि आमदार , खासदार यांच्या लाड पुरविण्यासाठी जनतेची पैसा खर्च केला जातो आपण उपरोक्त मतांशी सहमत असल्यास, पुढे अग्रेषित करा.नसल्यास, हा संदेश हटवा. 

🔴 आपण माझ्या 20+ पैकी एक आहात,