Sunday, 27 March 2022

आपल्या मुलांना जीवनाचा आस्वाद मुक्तपणाने घेऊ द्या.

 तीन मित्रांची गोष्ट आहे. लहानपणापासुन एकमेकांचे पक्के दोस्त. 


पहिला मित्र अतिशय हुशार, शाळेत पहिला नंबर कधिही न सोडणारा. प्रत्येक गोष्टीत अव्वल. 


दुसरा मित्र आपला सर्व सामान्य, अगदीच हुशार नाही पण नापास वगैरे न होणारा. नियमितपणे पुढच्या वर्गात न ढकलता जाणारा. आणि... 


तिसरा मित्र, अतिशय मस्तीखोर, टग्या, अभ्यासात दुर्लक्ष, शाळेत बारा भानगडी करणारा. 


पण तिघांची मैत्री मात्र घनिष्ठ. एकमेकांचे जिगरी दोस्त. पुढे शाळा संपली. 


हुशार मित्र जो होता, त्याने अपेक्षेप्रमाणेच इंजिनिअरिंग केलं, तिथेही अव्वल. पुढे Indian Engineering Services परिक्षा दिली आणि Class 1 अधिकारी पदी त्याची नियुक्ती झाली. पुढे हा अधिकारी, Chief Of Indian Railway झाला. 


दुसरा मित्र होता, त्याने शाळेनंतर Physics मध्ये पदवी पुर्ण केली. पुढे काय करायचं प्रश्न होता. प्रशासकिय सेवेत प्रयत्न करायचा होता. IAS ची परिक्षा दिली, पास झाला, मुलाखत पास झाला, आणि निवडला गेला. पुढे हा मुलगा, पहिला मित्र ज्या विभागात खाली कुठेतरी अधिकारी होता त्या खात्याचा सर्वोच्च म्हणजे सचिव झाला.


तिसरा मित्र, तर शाळा संपल्यानंतर पुढच्या शिक्षणाच्या वगैरे जास्त भानगडीत पडला नाही. पुढे त्याने योग्य वेळी, योग्य पक्षाकडून निवडणूक लढवली, खासदार झाला. आणि नंतर तर पहिले २ मित्र ज्या खात्यात अधिकारी होते त्या खात्याचा कॅबिनेट मिनिस्टर झाला.


ही काही काल्पनिक गोष्ट नाही. सत्य कथा आहे.


पहिला मित्र, अतिशय हुशार, तो म्हणजे, कोकण रेल्वेचे शिल्पकार, E.Radhakrishnan.त्यांना Metro Man, म्हणुनही संबोधतात. दिल्ली मेट्रोचे ते CEO होते. 


दुसरा मित्र म्हणजे, T. N. Sheshan. अतिशय कठोर आणि शिस्तप्रिय IAS Officer. भारतीय निवडणुक आयोगाचा दर्जा आणि प्रतिष्ठा उंचावण्यात त्यांचा फार मोठा वाटा आहे. आणि 


तिसरा मित्र म्हणजे, K. P. Unnikrishnan.लोकसभेवर सलग ५ वेळा निवडून गेले. पंतप्रधान V.P.Singh यांच्या मंत्रीमंडळात ते मंत्री होते. 


तात्पर्य

शाळा, शिक्षण, मार्क्स ही फक्त अनेक माध्यमांपैकी काही माध्यमं आहेत, उद्दिष्ट नाहीत. उद्दिष्ट तर खुप मोठी असावीत. आपल्या मुलांना ह्या माध्यामांचे गुलाम होऊ देऊ नका. त्यांना त्यांची उद्दिष्ट उंच ठेवायला सांगा आणि जीवनाचा आस्वाद मुक्तपणाने घेऊ द्या.


-----Whatsaap Collection----



Sunday, 20 March 2022

कॉन्व्हेंट संस्कृती आणि मराठी शाळा...........

एका पालकाची मुलाला पहिलीच्या वर्गात टाकताना सुचलेली अफलातून कल्पना.... ह्या कल्पनेला १०० तोफांची सलामी💣 १००% विचार करायला लावणारी ही गोष्ट. ज्यांचा मुलगा किंवा मुलगी २०२२ मध्ये "पहिलीला" जाणार त्यांच्या साठी खूप महत्वाची माहिती. मित्रांनो, माझं नाव विशाल काळे माझा मुलगा देव विशाल काळे याच्यासाठी मी "First standard" ला ऍडमिशन घेण्यासाठी पुण्यात बऱ्याच जागी फिस विचारली तर ४०,०००पासून १ लाखा पर्यंत आहे, नर्सरी ते यु के जी साठी सुद्धा सारखीच आहे. मग मला एक आयडिया सुचली की जर मुलांच्या शिक्षणासाठीच आज वर्षाला एवढे पैसे खर्च करायचे तरीही नोकरीची हमी असेल का नाही? तर नाही, प्रचंड स्पर्धा आणि इतर अडचणी आहेतच. मग मला वाटतं जर प्रत्येक वर्षी त्याला लागणारी फि जर रिलायन्स , टाटा , मारुती सुजूकी , हिंदुस्थान युनीलिव्हर , इन्फोसिस , अदानी, बजाज ,RVNL, LUPIN, REDDY, AMERRJA, L&T, SBIN, HDFC, ICICI, KOTAK, AXIS यासारख्या जगप्रसिद्ध कंपनींचे शेअर्स प्रत्येक वर्षी 1 लाखाचे घेतले आणि मुलाला "जिल्हा परिषद" च्या शाळेत घातले तर जर मुलगा कर्तृत्ववान असेल तर स्वत:ची प्रगती करेलच कारण कॉन्व्हेंट मध्ये फि भरुनही तो कर्तृत्वान होईलच अशी खात्री देनारी शाळा आजुनतरी या जगात ऊपलब्ध नाही म्हणुन ही फी कॉन्ह्वेंट मध्ये न भरता मुलाच्या पहिली च्या वर्गाला असताना १ लाख , १ री ला १ लाख , ३ री ला एक लाख.. अस करत करत १७ वीला त्याचे शेअर्स १७ लाख रुपयाचे असतील, आणि पहिल्या वर्गात घेतलेल्या शेअर्स ची किमत १७ वीला म्हणजे १७ वर्षांनी कमीतकमी ₹ १ कोटी असेल असे त्याच्या नांवे १७ शेअर्स असतील आणि जर आपण मागील १७ वर्षात वरील Top कंपनी चे शेअर्स ची किंमत पाहिली तर माझ्या मुलाकडे १७ वीला सतरा वर्षात एकुण रक्कम असेल कमीतकमी १.५ कोटी जास्तीत जास्त २१ कोटी..... मला अशी कल्पना सुचली जर कोणी यावर्षी मुलांना फर्स्टला घालणार असेल तर त्याला पहिलीला घाला यामुळे जिल्हापरिषद/ सरकारी शाळाही वाचतील, मातृभाषेतुन शिक्षणही मिळेल, शिक्षणसम्राटाना आळा बसेल, फोफावलेला भ्रष्टाचारही कमी होईल आणि एका बापाची आयुष्याची कमाई सुद्धा वाचेल आणि मुलाला शिक्षण पूर्ण झाल्यावर कोण्या कंपनीत किंवा नोकर म्हणून चाकरी करायची गरज पडणार नाही तोच इतराना रोजगार देऊ शकेल. विचार करा सर्वांनी ' Be Practical' बघा पटेल सर्वांनी एकदा अवश्य विचार करा सर्वांनी, आवडल्यास शेअर नक्कीच करा थोडी जन-जागृती होईल.. 
- एक शिक्षण व अर्थ तज्ञ पालक -


Tuesday, 8 March 2022

#बालपणीच्या गमती -जमती # - 3 -- परीक्षा आणि मित्र --

                   मित्रांनो, बोर्डाची परीक्षा म्हटले की, विध्यार्थ्यांच्या कपाळावर आठ्या येनारा विषय, काही विध्यार्थी पहिल्याच प्रयत्नात उत्तीर्ण होतात तर काहींना बरेच प्रयत्न करूनही यश लवकर येत नाही. काही महाभाग मात्र चिटिंगचा सहारा सुद्धा घेतात. परीक्षेच्या काळातील काही ना काही आठवणी प्रत्येकांच्या मनात असतातच, त्यापैकीच हा माझ्या आठवणीतील एक किस्सा. 

                  ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांचा इंग्रजी हा विषय म्हणजे फार मोठा वीक पॉईंट, तश्यातच आमचा ग्रामीण भागातील एक मित्र "राजू" हा तीनदा दहावीची परीक्षा देऊनही उत्तीर्ण होऊ न शकलेला विद्यार्थी, त्यामुळे आमच्या चिडविण्याचा विषय ठरलेला मित्र. नापास असल्यामुळे त्याचे आई, वडील, भाऊ, बहीण सुद्धा त्याचेवर नाराजच असायचे.

                 हा आमचा मित्र आमच्या घराशेजारीच राहायचा, तो माझ्यापेक्षा दोन वर्ष जुनियर होता. मी सायन्स चा विध्यार्थी असल्यामुळे माझ्याकडे तो त्याच्या काही अभ्यासाच्या अडचणी विचारायला यायचा पण तेवढ्यापुरतेच, त्याचे अभ्यासापेक्षा बॉडी बिल्डिंग, जिम याकडे त्याचा जास्त कल असायचा. तो दिसायलाही धिप्पाड, मजबूत बांध्याचा दिसायचा. आई, वडील, भाऊ, बहीण "अभ्यास कर",  "अभ्यास कर" वारंवार म्हणत, त्यामुळे त्यांना दाखविण्यासाठीच जणू माझ्याकडे तो यायचा. मला तो भाऊ म्हणायचा. 

                कालांतराने त्याची बोर्डाची परिक्षा जवळ आली, तो माझ्याजवळ येऊन म्हणाला "भाऊ, म्हाहे सर्व पेपर्स निंघालेत गा, पण फक्त हा इंग्रजी विषयच राहिला गा!!", "तू काहीही कर, पण मले इंग्रजी पेपर पास कराले मदत कर, मी तुले चहा नाश्ता पार्टी देईन". 

                   आता परीक्षा जवळ आल्यामुळे तो अभ्यास करायला माझ्या घरी रोज यायला लागला. रात्री उशिरापर्यंत अभ्यास करून सकाळी लवकर उठून तो जायचा, त्याच्या अभ्यासासाठी माझा धाकला (लहान) भाऊ सुद्धा मदत करायचा, परंतु दुसऱ्या दिवशी काल अभ्यास केलेल्या भागावरचे प्रश्न विचारले असता, त्याला त्याचे उत्तर सांगता यायचे नाही.  अशीही त्याची अफाट बुद्धिमत्ता. 

                  शेवटी परीक्षेचा दिवस उजाडला, "कसागा भाऊ! माझा त पुररा!! अभ्यास झालास त नाही. मले कापी तरी पुरोवजोगा!!",  अश्या आर्त स्वरात तो मला व माझ्या धाकल्या(लहान) भावाला म्हणाला. आम्हा दोघांनाही त्याची किंव आली.  परीक्षेचे सेंटर गावातच होते. आम्ही दोघेही (मी व माझा लहान भाऊ ) सकाळी लवकर उठून तयारी करून त्याला घेऊन, अकरा वाजताचा पेपर असल्यामुळे साडे दहा वाजताच परीक्षा केंद्रावर पोहोचलो. आम्ही सोबत असल्यामुळे राजू ची हिम्मत खूप वाढली, त्याचा आत्मविश्वासही सातव्या मजल्यावर होता.  त्याला बेस्ट ऑफ लक देऊन आम्ही परीक्षा केंद्राबाहेर थांबलो.

                     थोड्या वेळाने मोट्ठ्याने आवाज आला. "महेश भाऊ, ओ .......महेश भाऊ, हे....  हे...... इकडे..... , मागे.... ,  आssगा!!, ....  माझा नंबर खिडकीजवळच लागला गा". पाहतो तर काय? "राजू" खिडकी जवळून आवाज देत होता.  खिडकी जवळ नम्बर लागल्यामुळे त्याच्या आनंदाला पारावार उरला नाही. 

                     थोड्या वेळाने पेपर सुरु झाला. कोणीतरी दहा मिनिटातच काही प्रश्नपत्रिकेतील प्रश्न लिहून खिडकी बाहेर फेकले. माझ्या लहान भावाने ते घेऊन एका कागदावर त्याची उत्तरे लिहून तयार केली. पण त्याच्या दुसऱ्या मित्रांना सुद्धा ते पुरवायचे असल्याने आम्ही एखाद्या झेरॉक्स सेंटरचा शोध केला,  ते जवळच मिळाले पण त्याने नुकतेच दुकान उघडले असल्याने त्याचेकडे कोरा कागद उपलब्ध नव्हता, पण आम्ही घाईत असल्याने त्याला "कोणत्याही जुन्या कागदावर तरी झेरॉक्स दे" असा आग्रह केला. त्यावरून त्याने एक कागद दाखवला, आम्ही त्याला "ठीक आहे" म्हणताच त्याने त्याचेवर झेरॉक्स काढून दिली. लिहिलेला कागद दुसऱ्या मित्राला देऊन, काढलेली झेरॉक्स राजू कडे खिडकीतून दिली. राजू च्या हाती ती चिट लागताच त्याचा आनंद गगनात मावेनासा झाला. कसे बसे तीन तास संपून पेपर सुटला. 

                    राजू बाहेर येतांना त्याच्या चेहऱ्यावर जणू काही त्याने गोल्ड मेडल जिंकल्यासारखेच  भाव होते. आम्ही त्याची चौकशी केली, "कसा गेला पेपर, पास होशील कि नाही."   " पेपर एक नंबर गेला गा, नुसता पासच नाही तर ७०% तरी मार्क्स भेटीनं गा ! ", तो असे म्हणताच माझ्या लहान भावाने म्हटले, "तो होजाये, चहा नाश्ता पार्टी", "चालणं त मंग", असे म्हणत राजुने एका रेस्टोअरेन्ट मध्ये आम्हाला नेले. त्या ठिकाणी आम्ही बोलत-बोलत नाश्ता आटोपला,  चहा पिता पिता आमच्या चर्चा रंगात आल्या. मी राजुला विचारले, "किती प्रश्न सोडविले" यावर राजू म्हणाला, "आठ प्रश्न सोडविले........., पण गणितं कितव्या प्रश्नात होतं रे?" हे ऐकताच आमच्या दोघांच्याही कपाळावर आठया पडल्या. आम्ही दोघेही विचारात पडलो. माझ्या लहान भावाने मला शांत राहण्याचा इशारा केला व राजूस म्हटले, " आम्ही दिलेली कॉपी लिहिलेस कि नाही?"  "हो तं त्यांच्यातलेसतं होय बे थे गणितं" असे राजुने उत्तरताच आमच्या तोंडातील चहाचा फफकाराचं उडाला. परंतु आम्ही ते कंट्रोल केले. 

          राजू पुढे म्हणाला, "पण तुम्ही दिलेल्या कॉपी तुन एक साईड पूर्ण लिहिली, अन दुसऱ्या साइड्ची लिहायला गेलो तर वेळच झाला, आनं बेलच वाजली.................. "   

              यावर लहान भाऊ म्हणाला, " कोणती साईड लिहिली बे गणिताची का?"

              राजू म्हणाला, "हो"

😆😆😆😆😆😆😆😆😆😆😆😆😆😆😆😆😆😆😆😆😆


----०००----

(टीप - सदर लेख हा काल्पनिक असून त्यातील पात्र सुद्धा काल्पनिक आहेत, नावात साम्य असल्यास हा फक्त योगायोग असेल. वाचण्यास गोडी किंवा विनोद निर्माण होण्याच्या दृष्टीने त्यातील भाषा सुद्धा खेडपटच वापरण्यात आली आहे.) 

                 

 







       

Friday, 4 March 2022

मित्र - श्रीमंत किंवा गरीब नसतो, तो जीवलग असतो.

 सख्खे मित्र असावेतच


एकदा एका माकडाला अति दु:खामुळे मरण्याची इच्छा झाल्यावर; त्याने झोपलेल्या सिंहाचे कान ओढले. 

सिंहाने उठून रागाने गर्जना केली की, हे धाडस कोणी केले ? 

स्वतःच्या मृत्यूला कुणी बोलावले ?

माकड : मी कान ओढले, महाराज, सध्या मित्र नसल्यामुळे मी खूप उदास आहे; आणि मला मरण पाहिजे आहे, तुम्ही मला खाऊन टाका.

सिंहाने हसून विचारले : माझे कान ओढतांना, तुला कोणी पाहिले तर नाही ना ?

माकड : नाही महाराज.

सिंह : मग ठीक आहे, आणखी एक दोन वेळा कान खेच, खूप छान वाटतंय.

या कथेचे सार.

एकटा राहून जंगलाचा राजाही कंटाळतो.

म्हणून आपण आपल्या मित्रांच्या सतत संपर्कात रहा, त्यांचे कान ओढत रहा, म्हणजे चेष्टा मस्करी करत रहा. मेसेज येणे भाग्याचे समजा,  कोणीतरी आपली आठवण काढतंय. चांगल्या पोस्टला लाईक करा, वेगवेगळ्या विषयांवर चर्चा देवाण घेवाण करा. आनंद देण्यात घेण्यात असतो. बडबड करा. कंटाळवाणे होऊ नका. वयाला  विसरा मजा करत रहा.

विश्वास ठेवा की, तुमचे मन जर नेहमी आनंदी असेल तरच आपण नेहमी निरोगी राहू.

मित्र - श्रीमंत किंवा गरीब नसतो, मित्र  शिकलेला  वा  अडाणी  असावा असं काही नसतं. कारण-  मित्र हा मित्रच असतो तो जीवलग असतो.