Friday, 4 March 2022

मित्र - श्रीमंत किंवा गरीब नसतो, तो जीवलग असतो.

 सख्खे मित्र असावेतच


एकदा एका माकडाला अति दु:खामुळे मरण्याची इच्छा झाल्यावर; त्याने झोपलेल्या सिंहाचे कान ओढले. 

सिंहाने उठून रागाने गर्जना केली की, हे धाडस कोणी केले ? 

स्वतःच्या मृत्यूला कुणी बोलावले ?

माकड : मी कान ओढले, महाराज, सध्या मित्र नसल्यामुळे मी खूप उदास आहे; आणि मला मरण पाहिजे आहे, तुम्ही मला खाऊन टाका.

सिंहाने हसून विचारले : माझे कान ओढतांना, तुला कोणी पाहिले तर नाही ना ?

माकड : नाही महाराज.

सिंह : मग ठीक आहे, आणखी एक दोन वेळा कान खेच, खूप छान वाटतंय.

या कथेचे सार.

एकटा राहून जंगलाचा राजाही कंटाळतो.

म्हणून आपण आपल्या मित्रांच्या सतत संपर्कात रहा, त्यांचे कान ओढत रहा, म्हणजे चेष्टा मस्करी करत रहा. मेसेज येणे भाग्याचे समजा,  कोणीतरी आपली आठवण काढतंय. चांगल्या पोस्टला लाईक करा, वेगवेगळ्या विषयांवर चर्चा देवाण घेवाण करा. आनंद देण्यात घेण्यात असतो. बडबड करा. कंटाळवाणे होऊ नका. वयाला  विसरा मजा करत रहा.

विश्वास ठेवा की, तुमचे मन जर नेहमी आनंदी असेल तरच आपण नेहमी निरोगी राहू.

मित्र - श्रीमंत किंवा गरीब नसतो, मित्र  शिकलेला  वा  अडाणी  असावा असं काही नसतं. कारण-  मित्र हा मित्रच असतो तो जीवलग असतो.


No comments:

Post a Comment