प्रत्येक व्यक्तीने स्वत:च्या क्षमता व मर्यादा यांची जाणीव ठेवायला हवी...... क्षमता आणि आकांक्षा यात खूप अंतर असल्यास व्यक्तीला अपेक्षाभंग... निराशा व मानसिक संघर्ष इत्यादी नकारात्मक भावनांना तोंड द्यावे लागते......
त्यामुळे व्यक्तीला परिस्थितीनुसार स्वत:च्या ध्येय किंवा आकांक्षेची पातळी कमी जास्त करता यायला हवी..... दुराग्रहीवृत्ती व अट्टाहास मानवी जीवनात केवळ दु:ख व निराशा निर्माण करत नाही.... तर मानसिक संतुलनात अडथळे निर्माण करून पुढील जीवनात मानसिक आजारी बनवतात.....
जीवनात घेतलेला प्रत्येक निर्णय बरोबरच हवा असा आग्रह करू नये..... कालांतराने यापैकी काही निर्णय चुकल्याची जाणीव होते..... पण आपल्या हाती आता करण्यासारखे काहीचे नसते...... अशावेळी त्याबद्दल खंत न करता केवळ आपला निर्णय योग्य नव्हता.... ही जाणीव ठेवल्यास आपण स्वत:ला किंवा इतरांना दोष देण्याची चूक करणार नाही व त्यामुळे आपले मानसिक संतुलन ढळणार नाही..... लक्षात ठेवा ..... जीवनातील कोणत्याही कार्यात अपयश हा अपरिहार्य भाग आहे.....
आपणास सर्वच क्षेत्रात यशस्वी व्हायला आपल्याला आवडते..... यशाचे अत्युच्च टोक गाठल्यानंतर कोणतीही व्यक्ती त्या स्थानावर नेहमीकरता राहू शकत नाही..... जीवनात येणाऱ्या अपयशांमुळे प्रयत्न करणे सोडणे हे देखील बरोबर नाही..... अपयशाचा उपयोग यश प्राप्तीकरता होऊ शकतो हे प्रत्येकाने लक्षात ठेवावे.....
शेवटी काय तर .... आपली धडपड असते आपल्या आयुष्यातील सुखासाठी....आनंदात असण्यासाठी..... आपलं आयुष्य कसं सुखानं भरून जाईल.... असं आपण सतत स्वतःशीच घोकत असतो..... खरं असं, की आनंदात असण्यासाठी, सुखात असण्यासाठी आत्ताच्या वेळेपेक्षा दुसरी योग्य वेळ कोणतीही नाही...... यश - अपयश येतच राहणार ..... आयुष्यात आव्हानं तर असणार आहेतच...... ती स्विकारायची आणि ती झेलता झेलताच आनंदी राहायचा निश्चय करायचा हेच बरं नाही का..!
............... ...................
संग्रहित.....
No comments:
Post a Comment