Sunday, 10 October 2021

नागरिकांचा शासकीय कर्मचाऱ्यांकडे पाहण्याचा दृष्टिकोन.!!!

 जर्मनी मधे सुमारे तीस वर्षांपूर्वी तेथील शासकीय प्रशासनाकडून एक 

अभिनव प्रयोग करण्यात आला होता. 

शासकीय कर्मचारी खाजगी अस्थापना मधे कामासाठी पाठविण्यात आले 

तर खाजगी क्षेत्रातील कर्मचारी शासकीय आस्थापनेवर नियुक्त करण्यात आले. 

हा प्रयोग संपूर्ण एक महिन्यासाठी करण्यात आला. 

प्रयोगाअंती असे निदर्शनास आले की 

खाजगी आस्थापनेवर नेमलेल्या शासकीय कर्मचाऱ्यांकडून उत्तम कामकाज करण्यात आले, 

तर शासकीय आस्थापनेवर नेमणूक करण्यात आलेल्या खाजगी कर्मचाऱ्यांकडून कामकाज अत्यंत कमी प्रमाणात झाले. 

त्याची कारणमिमांसा करण्यात आली असता शासकीय कर्मचाऱ्यांकडून अनेक अडचणींवर मात करून रिझल्ट ओरिएंटेड काम करण्याचे कौशल्य आढळून आले. 

तर खाजगी क्षेत्रातील कर्मचाऱ्यांना 

साचेबद्ध , विनाअडथळा व आयडियल कंडिशन मधेच काम करण्याची सवय असल्याने ते आवश्यक रिझल्ट देण्यात अपयशी ठरले. 

या प्रयोगाच्या निष्कर्षानंतर जर्मनीतील सरकार व नागरिकांचा शासकीय कर्मचाऱ्यांकडे पाहण्याचा दृष्टिकोन आदरयुक्त झाला..!!!

👍😃👌👌


------WhatsApp Collection-------


Tuesday, 14 September 2021

!!!!!मराठी तरुण आणि शेती !!!!! ब्लॉग वाचून झाल्यावर खाली दिलेल्या लिंकवर क्लिक करा, डाउनलोड करा आणि बघा संपूर्ण चित्रपट.....''मुळशी पॅटर्न''

 एक शाश्वत मनोगत........  ....True 


पैसा नाही कमवला तर पुढच्या पिढीकडे एक गुंठाही जमीन शिल्लक राहणार नाही...

 टप्पा १:- १९५० ते १९७५ 

या कालावधीत मराठी माणसाकडे गावाकडे भरपूर जमीन होती.

सरासरी प्रत्येक कुटुंब २०-३० एकर जमिनीचे मालक...

मोठे वाडे...

दांडगा रुबाब...

निसर्गावर चालणारी शेती...

अगदी १० वी-१२ वी शिकलेले शिक्षक, मिलिटरी भरती, पोलीस भरती झाले तसेच स्पर्धा परीक्षेत सहज यश मिळायचे.

अनेक पदवीधर PSI, Dy. SP , तहसीलदार त्या काळात झाले.

नाही जरी नोकरी लागली तर आहे की 20-30 एकर शेती...

उत्तम शेती, दुय्य्म नोकरी, तृतीय व्यापार अशी म्हण होती. हा काळ म्हणजे मराठी माणूस राजा होता.

 *टप्पा २ :- १९७५ ते १९९५ 

* देश उद्योग व आधुनिकतेकडे जाऊ लागला, १९७१/७२ च्या दुष्काळापासून निसर्गाने झटका द्यायला सुरुवात केली.

शेतीची विभागणी सुरु झाली, २० एकराचे मालक ५ एकरावर आले.

बाहेरील राज्यातील कामगारांचे मुंबई शहरात शिरकाव सुरु झाले.

शेती आता भांडवलदाराची होऊ लागली. विहिरी, मोटारी, पाईप लाईन आल्या.

पाणी उपसण्याची स्पर्धा सुरु झाली.

राजकारण गावागावात घुसलं, पुढारपणाच्या नादात अनेकांनी जमीनी कवडी मोलाने विकल्या, बाई-बाटलीत अनेकजण बरबाद झाले.

स्पर्धा वाढली, आता नोकरी सोपी राहिली नाही.

हायस्कुलवर नोकरीचा दर २० लाख झाला.

वाढणाऱ्या गरजेपोटी जमिनी विकायला सुरवात झाली.

२० एकराचा मालक मोकळा झाला व गावच्या कट्ट्यावर विड्या फुकू लागला, पोरं बेकार फिरू लागली.

 टप्पा ३ :- १९९५ -२००९ 

हा काळ मराठी माणसाच्या जबरदस्त घसरगुंडीचा काळ.

परराज्यातून मोठया प्रमाणात लोक आले.

मोठे उद्योग यांनी काबीज केले, हॉटेल शेट्टी लोक, दूध-पेपर-भाजीपाला-टॅक्सी-पाणीपुरी-किरकोळ दुकानदारी उत्तरेतील लोकांनी काबीज केली.

सहकारी कारखाने, बँका, पेट्रोल पम्प, बिअर बार, दारू दुकानें चाणाक्ष पुढाऱ्यांची झाली.

मराठी माणूस मात्र अजूनही विहीर पाडतो...

बोअर मारतो...

स्पर्धा परीक्षा तयारी...

भरतीला जातो...

पोराला हायस्कुल वर चिटकवतो...

ह्यातच गुंतलेला दिसला. २० एकर जमीन वाटण्या होऊन, मग विकून एकरावर आली तरी डोळे उघडतं नव्हते.

अजूनही पाटीलकी, व जमीनदारीच्या दिवा स्वप्नात रमला होता.

 टप्पा ४ :- २००९ ते २०२० 

ग्लोबलायझेशन झाले, जगाचे पैसे भारतात आले.

पुणे, मुंबई, इतर शहराजवळील जमिनींना किंमती आल्या.

मग काय?

जमिनी विकायची स्पर्धाच सुरु झाली.

राजकीय कार्यकर्ते एजंट झाले व मराठी माणसाचा 'मुळशी पॅटर्न' झाला.

जमीनदारी संपली...

पोरं बेकार...

पुणे-मुंबईत ८ - १० हजारांच्या नोकऱ्या करू लागली.

आता विकायलाही काही शिल्लक राहिलं नाही.

खरी, बिकट गरिबी सुरु झाली.

पोरांचा वापर शंभर-दोनशे देऊन राजकारणात सुरु झाला.

बापाकडे लग्नाला पैसा नाही.

मग पोरी हात धरून पळून जाऊ लागल्या.

गावचा जमीनदार हमाली करू लागला.

व्यापार तृतीय म्हणायचे. त्यांचेकडेच हे बडे जमीनदार, त्यांची पोरं वॉचमन, हमाली, क्लार्क, ड्रायव्हर अश्या नोकऱ्या करू लागली व.....

जयंती साजरी करणेसाठी बड्या व्यापारी लोकांजवळ वर्गणी मागू लागली..

 *टप्पा ५ :- २०२० ते *२०30 

इथून पुढील काळ फक्त पैश्याचा असेल. ज्यांचेकडे पैसा तोच सरपंच, तोच आमदार...

नोकरी हा विषय संपला आहे!!!!

नोकरी शोधणारा त्यातच म्हातारा होईल.

उच्च जातीचा हताश होऊन बघत बसेल.

पैसा न कामविणाऱ्याकडे एक गुंठासुद्धा शिल्लक राहणार नाही.

शेती, नोकरीसह जो व्यवसाय करेल तोच काही कमवू शकेल.

म्हणून मराठी तरुणांना विनंती आहे अजून वेळ गेली नाही शेती सांभाळा शेती बरोबर जोडधंदे करा , नोकरी पेक्षा व्यवसाय करण्याचा विचार करा.....

जो चूक करतो तो माणूस...

तीच तीच चूक परत करतो तो वेडा माणूस...

जो दुसऱ्याच्या चुकापासून शिकतो तो शहाणा माणूस...

आता वेळ आहे झालेल्या चुका सुधारून त्या चूक पुन्हा होणार नाहीत हे पहा.... तर चला मग शाश्वत विकासाची साथ धरा, *


!!!!!मराठी तरुण आणि शेती !!!!!

खालील  ''मुळशी पॅटर्न''  वर क्लिक करा, डाउनलोड करा आणि बघा संपूर्ण चित्रपट 

मुळशी पॅटर्न 





"बाप हाच बापमाणुस असतो..."

 *सदर लेख खुप छान आहे.सर्वांनी वाचा आणि आपल्या पत्नीला देखील वाचायला द्या.*

 🚹  बाप कि बापडा ?  🚹

        ==========


    स्त्री तरुण झाली की आईबापाची साथ सोडते आणि पतीचा हात धरते. पस्तीशी चाळीशीपर्यंत ती नवऱ्याचं सर्वच ऐकते!! "मग तो चांगला असो की वाईट, सज्जन असो की दुर्जन, व्यसनी असो की ठसनी !"

    

👉जशी मुलं तरुण होतात तशी ती मुलांकडे वळते, त्यांच्या भावना समजून घेते, त्यांचे वाट्टेल ते लाड पुरविते, जे पाहीजे ते मुलांना खायला देते, नवऱ्याच्या चोरून मूलांना पैसे पुरविते, साहजिकच मुलं उत्पत्ती पासूनच आईच्या उदरांत, व जन्मापासून तिच्या सहवासात असतात.

☹️   बऱ्यांच परिवारात मुलं तरुण झाली, की बापाशी बोलत नाहीत.!!!


    त्यांना जे मागायचं ते आईकरवी वडिलांना निरोप पुरवितात, आईशी मनमोकळे पणाने बोलतात, तिला न हिचकिचता मनातील सर्व चांगल्या वाईट गोष्टी सांगून टाकतात. काही माताच मुलांच्या या सर्व गोष्टी आपल्या पतींना सांगतात. पण "जास्तीत जास्त महिला यापासून पतींना दूर ठेवतात." मुलांच्या वाईट सवयी व झालेल्या छोट्या मोठ्या चूका लपवितात, त्यावर पडदा टाकतात आणि मुलं मग भरकटतात, बिघडतात...!!


🥰   आईचं मुलावर नितांत प्रेम असावं पण ते आंधळं प्रेम असू नये. की ज्या प्रेमाने मुलांचं आयुष्य निकृष्ट (बर्बाद)  🥰  होईल.


     मुलं वीस वर्षाची झाली की, आईला फार मोठेपणा वाटतो मुलांचा ! आणि ते साहजिक आहे ! पण या कौतुका समवेत त्या आपल्या पतीकडे दुर्लक्ष करतात. ते काही बोलले तर मधेच बोलून त्यांचे शब्द, त्यांचे बोलणे थांबवतात. मग मुलांवर बापाचा वचक राहत नाही.


मुलांना आई चांगली वाटते अन् बाप वैरी वाटायला लागतो.


 🗣️  "वास्तविक कोणताच बाप मुलांचा वैरी नसतो..!! मुलांना व्यवहार कळावा, ते धैर्यशाली, नितीवान, शिलवान, बलवान बनावे. चांगल्या लोकांमधे उठावे बसावे, सर्वाचा त्यांनी मानसन्मान करावा अशा कितीतरी मानवी जिवन जगण्याच्या गोष्टी त्यांनीअचूकपणे कराव्या, यासाठी बाप मुलांना सतत रागावत असतो, टोकत असतो, मुलांना शिस्त लागावी हा त्याचा प्रामाणिक हेतूअसतो, मुलाच्या हातून काही चूकीचं घडू नये असं बापाला वाटते"  म्हणून तोआपल्या मुलांचे फालतू लाड करीत नाही. पण याचा कुठेच सकारात्मक विचार होत नाही. 🥸


"बापाचे गोडवे कुठेच गायले जात नाहीत"


"अशा परिस्थितीत माणूस खिन्न होतो, त्याच्या मनातील भावना पत्नी समजून घेत नाही."


   ती असं कधीच म्हणणार नाही की, "बाळा, तुझे वडील तुला तुझ्या भल्यासाठीच बोलतात, रागावतात. ते तुझ्या अभ्यासासाठीच तुला बोलतात, तुझ्या भल्यासाठीच सगळं करतात. ते तुला बोलतात पण त्यांचं तुझ्यावर प्रेम नाही असं तर होत नाही ना  ?"


उलट, अनेक आई म्हणतात  (मुलांच्या समोरच ) "बस करा, तुम्हाला माझी मुलंच दिसतात का नेहमी बोलायला?  घरात आले की सुरु होतात, तुम्हाला तर काहीच कळत नाही, मुलं मोठी झाली आता, त्यांचे मित्र बनायला पाहिजे तुम्ही, पण नाही..! लेकरांत जिवच नाही ना तुमचा ! कधीतरी प्रेमानं बोललेत का तुम्ही त्यांच्याशी...!!"


 अशाप्रकारे, आई नवऱ्याचा, मुलांसमोर पाणउतारा करते आणि "मीच तुला समजून घेते, मीच तुझ्यावर अलोट प्रेम करते, मीच सर्व काही करते," असा मात्रुत्वाच्या प्रेमाचा व श्रेष्ठत्वाचा आव आणते.!!


साहजिकच असे सतत 🔨'हँमरिंग' होऊन मुलं बापापासून दूर जातात.!!


म्हणून "वेळेचं भान ठेवा ! प्रपंच ही फार समजून उमजून करायची गोष्ट आहे"


"मुलांना सुसंस्कार देणे हे आईचेच काम आहे, पण त्यांना घडवतांना बापाचाही सहभाग आणि धाक असायलाच हवा !! हे कायम लक्षात ठेवा.!!" 


"लहानपणी बापाचा हात धरला, तर मोठेपणी कोणाचेही पाय धरायची वेळ येत नाही !!!!!!" 


"बाप  हाच बापमाणुस असतो..."


 "त्याला कृपया बापडा बनवु नका. !!!!!"

   ======= + =======


बाप आपल्यासाठी कसा तळमळीने वागतो व किती प्रेम करतो हे जाणून घेण्यासाठी आपल्या जीवनात एकदा "मी आणि माझा बाप"  हे "डॉ.  नरेंद्र जाधव" यांनी लिहिलेलं आत्मचरित्र अवश्य वाचा हा लेख वरील पुस्तकावर आधारित आहे.

🌸 वाचुन चांगले वाटले तर, आपल्या शेजारी राहणाऱ्यांना वाचायला द्या.कदाचित सुधारणा होईल. 🌸

🙏🌹🙏🌹🙏🌹🙏


-------  Whatsap Collection -------

Wednesday, 1 September 2021

शाळांना मिळणार 8 टक्के वेतनेत्तर अनुदान, शासनाकडून इतक्या कोटींची तरतूद…

 शाळांना पाच टक्के ऐवजी सात ते आठ टक्के वेतनेतर अनुदान मिळणार

औरंगाबादः मागील तीन वर्षापासून खासगी शिक्षण संस्थांच्या शाळांना शासनाने वेतनेत्तर अनुदान दिलं नाही. याबाबत शिक्षण संस्था महामंडळाने मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठात याचिका दाखल केली होती. यावर खंडपीठाने निर्णय देवून शिक्षण विभागाने त्वरीत शाळांना प्रचलित आयोगानुसार अनुदान देण्याचे निर्देश दिले असल्याची माहिती मा. केंद्रीयमंत्री विजय नवल पाटील यांनी दिली.

महाराष्ट्र शासनाने गेल्या तीन वर्षापासून खाजगी शिक्षण संस्थाच्या शाळांना एक रुपयाही वेतनेतर अनुदान दिलं नव्हतं. त्यामुळे महाराष्ट्र राज्य खाजगी शिक्षण संस्था महामंडळाचे अध्यक्ष विजय नवल पाटील यांनी ही मागणी वेळोवेळी लावून धरली होती. नुकतीच नवलपाटील यांच्या अध्यक्षतेखाली शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांच्या उपस्थितीत महामंडळाचे पदाधिकारी अशोक थोरात, रवींद्र फडवणीस, विजय गव्हाणे, गणपतराव बालवडकर, एस. पी. जवळकर, वाल्मीक सुरासे, आ. किरण सरनाईक, आ. सुधीर तांबे, आ. विक्रम काळे यांच्या उपस्थितीत विविध मागण्यांसाठी बैठक आयोजित केली होती.

महाराष्ट्र राज्य शिक्षण संस्था महामंडळाने प्रचलित त्या-त्या वेतन आयोगानुसार वेतनेतर अनुदान द्यावे, अशी मागणी करणारी याचिका मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठामध्ये दाखल केली होती. त्यानुसार खंडपीठाने निर्णय देऊन राज्य शासनाच्या शिक्षण विभागाने त्वरित शाळांना प्रचलित आयोगानुसार(७ सातव्या) वेतनेतर अनुदान द्यावे, असे निर्देश दिले होते. यासाठी रवींद्र फडवणीस यांनी कोर्टात पाठपुरावा करून शासनाने कोर्टाच्या निर्णयाला दिरंगाई केल्यामुळे शिक्षण विभागाच्या विरोधात अवमान याचिका दाखल केली होती. यामुळे शासनाने तात्काळ २३७ कोटी रुपये वेतनेतर अनुदानासाठी मंजूर केले. त्याचा पहिला हप्ता त्वरित शिक्षण आयुक्त यांच्याकडे वर्ग केला आहे.

शाळांना पाच टक्के ऐवजी सात ते आठ टक्के वेतनेतर अनुदान मिळणार आहे. कोरोना महामारीत शाळांच्या खर्चाला ही रक्कम उपयोगी पडणार आहे. यासाठी राज्यातील सर्व पदाधिकाऱ्यांनी पुढाकार घेतलेला होता.
महामंडळाचे अध्यक्ष विजय नवल पाटील यांनी वेतनेतर अनुदानासोबत शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी भरती, विनाअनुदानित शाळेवर व कनिष्ठ महाविद्यालयात काम करणाऱ्या शिक्षकांना त्वरित वेतन अनुदान द्यावे, अशी मागणीही शिक्षणमंत्री व अर्थमंत्र्यांकडे केली.


कोर्टाच्या निर्णयामुळे शासनाला वेतनेतर अनुदान देणे भाग पडले. याबद्दल महामंडळाच्या सर्व पदाधिकाऱ्यांनी समाधान व्यक्त केले. उर्वरित मागण्या मंजूर करून घेण्यासाठी राज्यातील सर्व संस्थाचालकांनी एकत्रित येऊन संघटना बळकट करून लढा द्यावा, असे आव्हान राज्य सरकार्यवाह मा. आ. विजय गव्हाणे, वसंत घुईखेडकर, रावसाहेब पाटील, शिवाजीराव माळकर सुक्रे, रामदास पवार, मनोज पाटील, अजित वडगावकर यांनी केले.

Tuesday, 10 August 2021

चला ज्योत जिवंत ठेवूया , कोरोनावर विजय मिळवूया ॥

 एका छोट्याशा गावात सर्वजण एकमेकांना ओळखत होते . ठराविक कालांतराने ते सर्वजण एकमेकांना भेटत. काहीतरी कारण काढून एकत्र येण्यावाचून त्यांना चैन पडत नसे. त्यात छोटी मोठी कुटुंबे , मित्रांचे ग्रुप , काही एकटी माणसे असे सर्वजण होती .


एक मध्यमवयीन एकटा  रहाणारा एक माणूस या बैठकांचा नियमित सदस्य होता. सर्व सामुदायिक कार्यक्रमात त्याचा हिरीरीने सहभाग असायचा . त्याची उपस्थिती सर्वांसाठी आनंददायक असायची .


मात्र काही काळापासून या नियमितपणे कौटुंबिक आणि समूहाच्या सभांना नियमितपणे हजर राहणाऱ्या  माणसाने, कोणतीही सूचना न देता, भाग घेणे बंद केले.


त्याची वाट पाहून काही आठवड्यांनंतर, गावातील वृद्ध सरपंचाने त्याच्या घरी जाऊन कारण शोधण्याचे ठरवले.


एका हिवाळ्याच्या गारठलेल्या संध्याकाळी सरपंच त्या माणसाच्या घरी गेले. 


त्या माणसाने शेकोटी पेटवली होती , आणी थंडीत उब मिळवण्यासाठी तो एकटाच , शांतपणे बसला होता .


त्या माणसाने सरपंचाचे  स्वागत केले. त्यांच्यात फार काही संवाद झाला नाही . नुसते अभिवादन फक्त .


त्यांच्या मूक संवादापेक्षा शेकोटीत जळणाऱ्या लाकडांचा आवाज जास्त होता .

दोघेही शेकोटीच्या ज्वालेकडे शांतपणे बघत बसले .


काही मिनिटांनंतर सरपंच उठले, त्यांनी त्या शेकोटीमधील एक मोठी लाकडाची जाळणारी फांदी , शेकोटीतून बाजूला काढली . आणी परत जागेवर जाऊन बसले.


तो माणूस हे सर्व निर्विकारपणे पहात होता .


थोड्या वेळात त्या बाजूला काढलेल्या लाकडाच्या फांदीतील ज्वाळा कमी झाली. अगदी विझलेल्या अवस्थेत आल्यानंतर ती फांदी अगदी काळी दिसू लागली . थोड्या वेळापूर्वी प्रकाशमान तेजस्वी असणाऱ्या त्या लाकडात आता काहीही उरले नव्हते . तो एक निर्जीव काळा लाकडाचा तुकडा उरला होता .


अजूनही दोन्ही व्यक्तीमध्ये काहीच संवाद झाला नव्हता .


निघण्याची तयारी करण्यापूर्वी, सरपंचाने तो  लाकडाचा निरुपयोगी तुकडा उचलला आणि तो पुन्हा आगीच्या मध्यभागी ठेवला. 


ताबडतोब, तो लाकडाचा तुकडा पुन्हा जागृत झाला, पुन्हा तो तेजस्वी दिसू लागला.


जेव्हा सरपंच  निघणार होते  आणि दारात पोहोचला होते , तेव्हा तो माणूस म्हणाला:


 ‘तुमच्या येण्याबद्दल आणि तुमच्या सुंदर शिकवणीसाठी  धन्यवाद. मी लवकरच ग्रुपमध्ये परत येईन . ’


आपल्या जीवनात ग्रुप, समुदाय का  महत्वाचा  आहे?


कारण मागे राहिलेला प्रत्येक अविकसित सदस्य , बाकीच्या मित्रांकडून उर्जा, तेज घेतो. 


ग्रुपच्या सर्व  सदस्यांना ते एकत्र उर्जेचा, ज्वालेचा,  भाग आहेत याची जाणीव असणे हे खूप महत्वाचे आहे 


हे लक्षात ठेवणे देखील महत्वाचे आणी धीर देणारे आहे कि आपण सर्वजण एकमेकांची ज्योत तेजस्वी ठेवण्यास  जबाबदार आहोत.


ग्रुप देखील एक कुटूंब आहे


कधीकधी आपण काही  मेसेजेस, भांडणे आणि गैरसमजांनी कंटाळलो तरी हरकत नाही.

एकमेकांशी संपर्क असणे महत्वाचे आहे . 


आपण  येथे भेटण्यासाठी, संदेश देण्यासाठी, शिकण्यासाठी, कल्पनांची देवाणघेवाण करण्यासाठी आहोत आणी आपल्यापैकी कोणीच  एकटे नसल्याचे जाणून घेण्यासाठी येथे आहोत.


चला ज्योत जिवंत ठेवूया ,

कोरोनावर विजय मिळवूया ॥

Friday, 6 August 2021

कोरोना, बोर्डाच्या परिक्षा आणि विद्यार्थ्यांची मानसिकता.

 "मी नाही वाटणार पेढे"

 

काल १०वी आणि १२ वी चा रिझल्ट लागला. माझ्या एका मित्राचा मुलगा पडल्या चेहऱ्याने पेढे घेऊन आला होता. खरं तर तो खूप हुशार. १०वी ला ९३% टक्के मिळवलेला. सिन्सिअर , कष्टाळू. त्याचा पडलेला चेहरा पाहून मला जरा आश्चर्यच वाटलं.  त्याने पेढे दिले , नमस्कार केला.  मी त्याला बसायला सांगितलं, आतून एक पाकीट आणून त्याला बक्षीस दिलं. विचारलं किती मार्क्स मिळाले. ९४%. मी त्याला म्हंटलं "वा फार छान, तू वर्षभर मन लावून अभ्यास केला होतास , मला खात्री आहे की परीक्षा घेतली असती तर तुला इतकेच किंवा जास्तच पडले असते". आणि काही कळायच्या आत तो ओक्सबोक्शी रडू लागला. मी त्याला मनसोक्त रडू दिलं. पाणी दिलं. थोडा शांत झाल्यावर रडत रडत तो बोलू लागला. 


"काका , तरी मी आई -बाबांना सांगत होतो की मला कोणाला पेढे वाटायचे नाहीत. तुमच्या कडे जायच्या आधी ४ घरी जाऊन आलो. सगळीकडे हेच -  "काय मजा आहे बाबा तुमची ...परीक्षा नाही".,"मार्क्स नुसते वाटले आहेत..आमच्या वेळी असलं नव्हतं", "या वर्षी त्या ९५%-९७% टक्क्यांना काही अर्थ नाही..सगळ्यांनाच मिळाले आहेत" ते एक काका तर म्हणाले "जे नापास झाले त्यांचं खरं कौतुक आहे या वर्षी". दुसरे म्हणाले "तुमच्या बॅच ला नोकरी मिळण्यात जाम प्रॉब्लेम येणार"


मला सांगा ना काका , यात माझं किंवा आमचं काय चुकलं. पूर्ण वर्ष भर कॉलेज नाही , क्लास नाही. त्या सगळ्या ऑनलाईन शी कोप अप करत अभ्यास केला. सुरवातीचे ६ महिने मला लॅपटॉप नव्हता.  बाबा घरी आले , त्यांचे काम झाले की मी रात्री जागून रेकॉर्डेड सेशन्स ऐकायचो , नोट्स काढायचो. हे नाही दिसलं कोणाला. पोरशन तर ऑक्टोबर, नोव्हेंबर मधेच पूर्ण झाला होता. तेव्हा पासून पेपर सोडवतोय. ३ रिव्हिजन्स पूर्ण केल्या. आपण इन पर्सन शिकलो नाही आहे या भीतीने आणि दबावाने परत -परत वाचलं. अगदी कंटाळा येई पर्यंत. मग कळलं की २५% सिलॅबस कमी केलाय. चिडचिड झाली पण कोणाला सांगणार. उरलेल्या पोरशन ची परत अजून रिव्हिजन. ती दोनदा झाली. परीक्षेची तारीख नक्की होईना. सगळंच अधांतरी. 


मग कळलं की बहुदा ऑनलाईन MCQ बेस्ड होणार. परत त्या दृष्टीने रिविजन. काय विचारतील माहित नाही. स्वतःच MCQ बेस्ड प्रश्न काढायचे. कंटाळा आला होता पण आई -बाबांचे सल्ले, की लकी आहात , जास्त वेळ मिळाला आहे तुम्हाला अभ्यासाला या वर्षी, त्यामुळे चांगले मार्क्स पडले पाहिजेतच. अपेक्षांचं वाढत टेन्शन. वर कोविड मुळे गावाकडे माझे आजोबा गेले, माझ्या मित्राचे बाबा ८ दिवस व्हेंटिलेटर वर होते. त्याच मोराल बूस्ट करायला दिवसातून सतत त्याच्याशी चाट करायचो तर आई ओरडायची तू कशाला तुझा वेळ घालवतोस. बाबा जरा उशिरा उठला तर धस्स व्हायचं , चार वेळा त्याच्या खोलीत चकरा मारायचो. काका सांगा ना मला , आम्ही काय यंत्र आहोत का ? आम्हाला भावना आहेत का नाही ? या सगळ्या बातम्यांचा आमच्यावर परिणाम होत नसेल? मला तर वाटू लागलं होत की हे मार्क , ती इंजिनिअरिंग ची / मेडिकलची ऍडमिशन ह्याला काहीच अर्थ नाही. कशाला इतका आटापिटा करायचा ? पण नाही ..हे सगळं लवकरच संपणार आहे अशी स्वतःची समजूत घालायची आणि परत फोकस्ड प्रयत्न चालू. कोणाशी काही बोलायची सोय नाही ..एकच पालुपद ...तुला काय करायचं आहे ...तू अभ्यास कर.  कसा करू ??? रोज इतकी माणसं मरता आहेत , साधा ऑक्सिजन मिळत नाही. 


काका , मला सांगा ना या आधी अशा विपरीत परिस्थितीत कोणत्या बॅच ने अभ्यास केला होता. अरे कौतुक नको पण कमीतकमी टोमणे तर मारू नका. मिळालेला पेढा काही न बोलता खाणं इतकं अवघड आहे का हो काका?


खरंच सांगतो काका माझा अभ्यास झालाय. कधीही आणि कशीही परीक्षा घेतली तरी मी ९४%-९५% पाडीन याची खात्री आहे मला. काका, हे बाकीचे पेढे मी येथेच ठेवून जातो पण प्लीज आई -बाबांना सांगू नका. आणि तो गेला. 


कृपया कोणी पेढे घेऊन आलं तर त्यांनी विपरीत परिस्थितीत केलेल्या प्रयत्नांचं कौतुक करा. एखादी कॅडबरी ,छोटीशी गिफ्ट द्या.   नसेलच जमणार तर पेढा तोंडात टाका आणि गप्प रहा पण चेष्टा करू नका. मोठ्या उमेदीने 'भविष्य' उभं राहू पाहतंय. टेकू द्या. नाहीच जमले तर कमीतकमी मागे तरी ओढू नका


---------WhatsApp Collection--------


Sunday, 1 August 2021

कोरोना आणि ऑफिस.......

 *करोनाशी आमने-सामने..*

*[An Encounter with Corona...]*

- आशुतोष शेवाळकर. 


गेले काही दिवस माझ्या ऑफिस मधले सात-आठ सहकारी पॉझिटिव्ह, त्यातला धंद्याच्या सुरुवातीपासून माझ्याशी जुळलेला असलेला एक गेला, दुसरा माझा उजवा हात असलेला एक हॉस्पिटलमध्ये जीवन मरणाची झुंज देतो आहे, घरी काम करणारी तीन लोकं पॉझिटिव्ह, माझी मुलगी व आई सुद्धा पॉझिटिव्ह, अशी सगळी परिस्थिती व प्रचंड शारीरिक, मानसिक, बौद्धिक धावपळ आणि ताण असं सुरू आहे. 

त्यातच मग दिवसभरात ओळखीच्या लोकांचे फोनस्, ‘कुठल्या तरी हॉस्पिटलला बेड मिळेल का’?' किंवा व्हेंटीलेटर वा रेमडेसिविर साठीची आर्जवं, यावर आपले प्रयत्न, त्यात अपयश या सगळ्याचा एक हताश असहायपणा याची भर. मध्येच  मोबाइल मधे एखादा नंबर कॉल आला तर कुणाची तरी काही इमरजन्सी असावी म्हणून तो उचलावा तर त्यात टेप वाजणे ‘‘आपके बाद आपके फॅमिली का क्या होगा ये आपने कभी सोचा है..??? एक करोड का टर्म इन्शुरेंस’’ वगैरे अशी प्रेताच्या टाळूवरचं लोणी खाणारी कुठल्यातरी इन्शुरन्स कंपनीची व्यापारी जाहिरात व त्याचं प्रचंड ‘इरीटेशन’ येणे, हे पण सुरू. अशा  सगळ्यातून थोडी उसंत मिळालेल्या काही वेळात मी हा मजकूर लिहितो आहे. 

*या सगळ्या दिवसांमधे या सर्व अनुभवातून जाताना, मला समजलेल्या, सापडलेल्या काही गोष्टींमध्ये काही तथ्यांश असेल तर त्याचा फायदा आता याच सगळ्यातून जात असलेल्या इतर काही लोकांना व्हावा एवढाच हे सगळं घाईनी लिहिण्याचा उद्देश आहे.* 


*1) फॅबी-फ्लू आणि रेमडेसिविर :


कोरोनावर काहीही औषध अजून सापडलेलं नाही आहे, असं सगळंच जग, सगळेच डॉक्टर्स सांगत आहेत. स्वतःच्या रोगप्रतिकारक शक्ती (इम्युनिटी) च्या व्यतिरिक्त वाफ व गार्गल्स  हीच हे इन्फेक्शन मारण्याची हत्यारं आपल्या जवळ आहेत. 

फॅबी-फ्लू हे ‘सार्स-२’ वरचे व रेमडेसीवीर हे ‘इबोला’ व्हायरस वरचे औषध आहे. मागच्या वर्षी जसे करोनाच्या रुग्णाला क्लोरोक्वीन हे मलेरिया वरचे औषध देऊन पाहिले जात होते, तशी यावर्षी ही  दोन औषधं देऊन पाहिली जात आहेत. क्लोरोक्वीन व  आयव्हरमॅक्टिन एकत्र दिल्यामुळे परदेशात काही लोकांचा मृत्यू झाला. त्यानंतर क्लोरोक्वीन कोविड च्या ट्रीटमेंट मधून बाद करण्यात आलं. रेमडेसीवीर हे औषध सुद्धा आता ‘युरोपियन करोना प्रोटोकॉल’ मधून बाद करण्यात आलं आहे आणि भारतात फक्त 2(E) या कॅटेगरीच्या वरच्या  रुग्णांनाच ते औषध दिलं जावं असे निर्देश ‘आयसीएमआर’नी काढले आहेत. महाराष्ट्राच्या कोविड टास्क फोर्सच्या डॉक्टरांनी पण इलेक्ट्रोनिक मीडिया वर याविषयी सविस्तर मुलाखत दिलेली आहे. करोनावर काही औषधच अजून सापडलेलं नसल्यानी जे काही उपलब्ध आहे ते देऊन पाहा अशी ‘ट्रायल अँड एरर’ पॉलिसी आधुनिक वैद्यकीय शास्त्राला सध्या असहाय्यतेपायी करावी लागते आहे. 

         रेमडेसिविर हे ‘हायली टॉकसीक’ औषध असल्यानी त्याचा किडनीवर व लीव्हर वर वाईट परिणाम होऊ शकतो. काही   रुग्ण यात ‘टॉक्सिक शॉक’नी ताबडतोब मरू पण शकतात. त्यामुळे लीव्हर आणी किडनीच्या योग्य त्या चाचण्या केल्या शिवाय हे औषध खरं तर देण्यात येऊ नये. पण अनेक छोट्या मोठ्या हॉस्पिटल्स मधुन वा छोट्या गावांमधून वा रुग्णाच्या आप्तांच्या आग्रहामुळे हे औषध अशा चाचण्याविनाही कुठे कुठे दिले जाते आहे. व त्याचे दुष्परिणाम म्हणून काही मृत्यू रेमडेसिविर मुळे पण झालेले असावेत, पण ते करोनाच्या नावानीच नोंदल्या गेले आहेत. करोनाच्या मृत्यूचे पोस्ट- मार्टेम करणे सध्या शक्यही नाही व तसा नियमही नाही आहे. अन्यथा त्यातून अनेक इतर सत्य बाहेर येतील. ‘इबोला’ हा विषाणूच जगातून जवळपास संपुष्टात आल्यानी या औषधांचा जमलेला साठा हा खरे तर या फार्मासुटीकल कंपन्यांसाठी प्रॉब्लेम होता. पण करोनामुळे त्यांचे नशीब आता फळफळले आहे किंवा जगाच्या आरोग्य संघटनांच्या नेटवर्किंग मधून त्यांनी ते  फळफळवून घेतलं आहे.  

 या शिवाय वैद्यकीय शास्त्राच्या या ‘नोबल प्रॉफेशन’ मधे काही टक्के लोकांच्या व्यापारी वृत्तीनेही सध्याच्या परिस्थितिमुळे डोकं वर काढलेलं आहे. त्यामुळे रुग्णाच्या आप्तांच्या चेहेऱ्यावरील भाव आणि खिशाची जाडी याप्रमाणे औषध योजना केली जाते आहे. त्यात मग ४०-४० हजारांचं एक अशी काही इंजेक्शन्स  पण आलीत. 

आता २ कोटी कॅपिटेशन फी देऊन वैद्यकीय शिक्षण घेतलेल्या डॉक्टरांच्या नवीन पिढीला आपण कुठल्या तोंडानी त्यांनी ‘नोबल प्रॉफेशन’ करावं असं सांगू शकतो? या दैवी व्यवसायाला भ्रष्ट करण्याची सुरुवात आपण तिथूनच केलेली आहे. आधीच्या सारखे ऋषीतुल्य डॉक्टर्स निर्माण होणं आता हल्ली सध्याच्या काळात दुरापास्त होत चाललं आहे. त्यामुळे वैद्यकीय व्यवसाय एक ‘नोबल प्रोफेशन’ आहे ही हळुहळू आता एक दंतकथा होत चालली आहे. 

याशिवाय फक्त स्टेथोस्कोप, बी.पी. ॲपरेटस् आणि एक कंपाऊंडर घेऊन बसण्याच्या आधीच्या जमान्यात वैद्यकीय शास्त्राला  ‘नोबल प्रोफेशन’ म्हणून जगणं शक्य पण होते. पण कोट्यवधी रुपये लावून दवाखाना, महागडी उपकरणे, मशीनरी, व त्यांचं दर महिन्याला कोट्यवधी रुपये व्याज भरणाऱ्या हॉस्पिटल्सना धंद्यासारखी व्यापारी वृत्ती ठेवणं पण मजबुरीने मग हळू हळू भागच होत जातं. 


*(२)  माझा स्वतःचा याबाबतीतला अनुभव आणी अनुमान:*  


माझ्या ऑफिस मधल्या सगळ्या सहकार्‍यांना त्यांच्या त्यांच्या डॉक्टरांनी आधी फॅबी-फ्लू दिले. त्या ९-५ – ४-३ अशा गोळ्या खाऊन त्यांचा थकवा प्रचंड वाढला व सिटी स्कोअर ६ चा ९ किंवा १२ वर गेला. यातल्या दोन सहकाऱ्यांना मग हॉस्पिटलला अॅडमीट करून रेमडेसीवीर दिल्या गेले. त्यानंतर त्यांची तब्येत अजून खालावली आणि त्यातला एक गेला व दुसरा मृत्यूशी झुंज देतो आहे. रेमडेसीवीर घेऊनही त्यांच्या फुफ्फुसांतले इन्फेक्शन दिवसागणिक वाढतच गेले.  

ही सगळी परिस्थिती आधीच झेलत असताना माझ्या घरचे ५ लोकं जेव्हा पॉझीटिव्ह आलेत तेव्हा त्यांना कोणती ट्रीटमेंट द्यावी, हॉस्पिटलला अॅडमिट करावे की नाही? या प्रश्नांनी  पहिल्या दोन दिवसांत माझ्या मनाची प्रचंड घालमेल, तडफड झाली.  कुठल्याही बाजूने निर्णय घेतला तरी इकडे आड तिकडे विहीर अशी परिस्थिति होती.  आणि ताबडतोब काही निर्णय घेणं पण भाग होतं. अशा वेळेस मनाची जी तळमळीची द्विधा मनःस्थिती होते तिचं मी शब्दात वर्णन करू शकत नाही. आणि त्यात ज्याविषयी निर्णय घ्यायचा आहे त्या क्षेत्राचं आपल्याला ज्ञान नाही, याला त्याला विचारून उधार उसनवारीच्या ज्ञानावर अवलंबून राहून हा निर्णय घ्यायचा असतो. मनाची कठोर परीक्षा घेणारा असा हा काळ होता. 

शेवटी प्रचंड घालमेली नंतर मी आतल्या आवाजाच्या मदतीनी  आपल्या घरच्या लोकांना ही औषधं द्यायची नाहीत व त्यांना हॉस्पिटलमधे अॅडमिटही करायचं नाही असा निर्णय घेतला. माझे डॉक्टर मित्र प्लॅटिना हॉस्पिटलचे डॉ.मुंधडा व अकोल्याचा डॉ.विवेक देशपांडे यांच्या मदतीनी आणि नागपूरचे ऋषीतुल्य डॉक्टर उदय माहोरकर व  त्यांचा मुलगा डॉक्टर विराग यांच्या सल्द्यानी घरीच उपचार सुरू केलेत. ‘ऑक्सिजन कॉन्सनट्रेटर’ भाड्याने मिळतो. काही इमरर्जन्सी आल्यास म्हणून तो ही घरी आणून ठेवला. 

‘व्हायरल इन्फेक्शन’शी झगडताना आपल्या शरीराच्या लिंफोसाईटस् कमी होतात व म्हणून अशा परिस्थितीत ‘सेकंडरी बॅक्टेरीयल इन्फेक्शन’ होऊ शकतं म्हणून एजीथ्रोमायसीन हे  अॅंटीबायोटिक, आयव्हरमॅक्टिन हे जंतांसाठी असलेले औषध ‘व्हायरसच्या रीप्लीकेशन’ला बऱ्याच प्रमाणात थोपवतं असा ‘स्टडी’ असल्यामुळे ते व व्हीटामीन सी, बी, डी आणि झिंक यांच्या गोळ्या ही कोविड ची ‘बेसिक ट्रीटमेंट’ मी या सगळ्या डॉक्टर मंडळींच्या सल्ल्यानी घरच्या सगळयांना सुरू केली. ही सगळी लोकं आता बरं  होण्याच्या मार्गावर आहेत. माझ्या ऑफिसच्या दुसऱ्या एका सहकाऱ्याला मी त्याचं मन वळवून हॉस्पिटलच्या दारातून परत आणण्यात यशस्वी झालो. त्याला पण हीच ट्रीटमेंट सुरू केली व सीटी स्कोअर e वर गेलेला तो पण आता बरा होण्याच्या मार्गावर आहे.                                    

माझ्या पांढराबोडीच्या झोपडपट्टी मध्ये प्रॅक्टिस करणाऱ्या डॉक्टर सुनील गोलर या मित्रानी या काळात 70 रुग्णांना हीच ‘बेसिक ट्रीटमेंट’ दिली. त्यातला एक दगावला, बाकी ६९ रुग्ण बरे झालेत. सध्या होणाऱ्या मृत्यूचं मध्यमवर्गीयांच्या वर आणि गरीब यांची टक्केवारी असं एक सर्वेक्षण सुद्धा खरं म्हणजे ताबडतोब करून घेतलं पाहिजे. गरिबांमधे मृत्यू दर कमी असेल तर त्यांना न मिळणारी ही औषधं हे त्याचं एक मोठं कारण असू शकतं. स्मशानातल्या नोंदीवरून (गरीब-श्रीमंत सगळे शेवटी सरसकट तिथेच जातात) घरी झालेले मृत्यू आणि हॉस्पीटल्स मधले मृत्यू असं ही एक सर्वेक्षण सहज होऊ शकतं. स्मशानांच्या नोंद रजिस्टर मध्ये रोग, ठिकाण हे सगळेच रकाने असतात. स्मशानतल्या कोविड मृत्यूंची एका दिवसाची नोंद २८८ आणि त्या दिवशीच्या कोविड मृत्यूंचा महानगरपालिकेनी जाहीर केलेला आकडा ८९ असं ‘शोध-पत्रकारिता’ करून नागपूरच्या एका वृत्तपत्रानी नुकतच छापलं आहे.             

या सगळ्या अनुभवातून गेल्यावर माझं स्वतःचं  याबाबतीतलं अनुमान असं आहे. फॅबी-फ्लू, रेमडेसीवीर ही औषधे करोनाच्या जंतूच्या बाबतीत काम करत नाहीत हे तर डॉक्टर लोक स्वतःच सांगतात. मग कदाचित कोरोनाशी झगडणाऱ्या आपल्या शरीराला ही जड औषध देऊन आपण आणखी थकवत असू किंवा या औषधातच गुंतवून ठेवल्यामुळे कोरोनाशी लढण्याची आपली प्रतिकार शक्ती तेढ्या अंशी कमी होत असेल व करोनाचा प्रादुर्भाव तेवढा मग वाढत जात असेल किंवा कदाचित ही औषधे आपल्या शरीरानी तयार केलेल्या कोरोनाशी लढणाऱ्या अँटीबॉडीजनाच मारत असतील व म्हणून कोरोनाचं इन्फेक्शन ही औषधं घेतल्यावर आणखी वाढत जात असेल, या दोन्ही शक्यता याबाबतीत विचारात घेतल्या पाहिजेत.   

कुठल्याही रोगाचं ‘बॅक्टेरियल इन्फेक्शन’ झालं की जेव्हा आपण कुठलंही अँटि-बायोटिक घेतो तेव्हा त्या बॅक्टेरियाच्या जंतू सोबतच आपल्या शरीरातले अनेक उपयुक्त जंतू पण मरत असतात. यात आपल्या शरीरानी तो पर्यंत तयार केलेल्या इतर रोगांच्या अँटीबॉडीज पण मरत असतात व त्यामुळे अँटि-बायोटिकचा कोर्स कुठल्याही कारणानी घ्यावा लागल्यावर  त्यानंतरच्या सहा-आठ महिन्यात आपण पुन्हा दुसऱ्या कुठल्या इन्फेक्शननी  आजारी पडतो, असा बऱ्याचदा अनुभव येत असतो हे इथे लक्षात घेतलं पाहिजे. 


*३) स्टिरॉइड :


स्टिरॉइडनी व्हायरल इन्फेक्शन कमी व्हायला मदत होते हे नक्कीच खरं आहे. पण स्टिरॉइडनी शरीरातलं बॅक्टेरीयल इन्फेक्शन वाढण्याची पण 50 टक्के शक्यता असते. शिवाय स्टिरॉइड घेतल्यानी आपल्या शरीरातली ‘शुगर लेव्हल’ पण वाढत असते व ‘शुगर लेव्हल’ वाढल्यानी पण इन्फेक्शन वाढण्याची शक्यता असते. त्यामुळे हे स्टिरॉइड देण्याची रोगाच्या स्टेज मधली एक निश्चित वेळ असते व त्याच प्रमाणे त्याचा तसा डोस ठरवणं हे पण एक महत्वाचं काम असतं. ही गोष्ट अनुभवी व परिपक्व डॉक्टरच करू शकतात. त्यामुळे स्टिरॉइड सुरू करण्याचा निर्णय अशा योग्य डॉक्टरच्या सल्ल्याशिवाय कधीच घेऊ नये. माझ्या सध्या मृत्यूशी झुंज देत असलेल्या ३६ वर्षाच्या सहकाऱ्याला सुद्धा ताप उतरत नाही म्हणून एका खासगी डॉक्टरने संध्याकाळी स्टिरॉइडचे इंजेक्शन दिल्यावर एका रात्रीत त्याचं इन्फेक्शन इतकं वाढलं की दुसऱ्या दिवशी त्याला श्वास घ्यायला सुद्धा त्रास व्हायला सुरुवात होऊन त्याला हॉस्पिटलमध्ये ॲडमिट करावं लागलेलं आहे. व आता तर त्याला ‘एअर अॅम्ब्युलन्स’ नी ‘लंग ट्रान्सप्लांट’ साठी हैद्राबादला हलविण्याची वेळ आलेली आहे. आज रात्रीत किंवा उद्या दुपारी ते होईल. 

       

*४) एचआर सीटी स्कोअर:*


‘सीटी स्कोअर’ हा सध्या खूप चलनात आलेला शब्द आहे. हा स्कोअर म्हणजे काय आहे हेसुद्धा त्यासाठी स्वतः अभ्यास करून समजून घेतलं पाहिजे. 

या स्कोअर मधे ‘डाव्या फुफ्फुसाचे खालचा व वरचा असे दोन भाग व उजव्या फुफ्फुसाचे खालचा, वरचा व मधला असे तीन भाग गृहीत धरून फुफ्फुसाचे एकूण पाच भाग करण्यात आलेले आहेत. या भागांमध्ये ५ टक्के इन्फेक्शन ला 1 मार्क, 5 ते 25 टक्के ला 2 मार्क, 25 ते 50 टक्के ला 3 मार्क 50 ते 75  टक्के ला 4 मार्क व 75 टक्क्याच्या वर इन्फेक्शन असल्यास 5 मार्क असा पाच भागाचा मिळून हा 25 चा स्कोअर आहे. 

त्यामुळे सगळ्या भागात 26 टक्के इन्फेक्शन झालं असलं तरी त्या रुग्णाचा स्कोअर 15 येतो व 49 टक्के इन्फेक्शन असलं तरी 15 च!! या स्कोअर वर इतक्या प्रचंड संखेच्या रुग्णांवर पुढच्या ट्रीटमेंटचे निर्णय घेतले जात असल्याने हा स्कोअर थोडा अजून ‘स्पेसिफिक’ करायला पाहिजे असं वाटतं. 10-10 टक्के इन्फेक्शन ला 1-1 मार्क या प्रमाणे हा स्कोअर 100 पैकी किती असा खरं तर करायला पाहिजे. कुठल्या तांत्रिक कारणामुळे असं करणं शक्य नसेल तर त्याची मला कल्पना नाही.  


*५) अमरावती, विदर्भ, बंगाल नवीन स्ट्रेन:*


आता करोनानी स्वतःच म्युटेशन करून नवीन स्ट्रेन आणला आहे व त्याची सुरुवात अमरावती पासून झाली आहे असं बोलल्या जातं. या स्ट्रेननी माणसाची इम्युनिटीच प्रभावित होते, फुफ्फुसाव्यतिरिक्त हा स्ट्रेन माणसाच्या ‘इम्युनिटी’वरच हल्ला करतो व त्यामुळे रक्तात गुठळ्या तयार होऊन माणसं मरू शकतात असं म्हटल्या जातं आहे. असं म्हटल्या जाण्यामागचे कारण म्हणजे या रुग्णांच्या रक्त तपासण्यांमध्ये D-Dimer, CRP, IL-6, Ferritin  या इम्युनिटीच्या ‘बायो-मार्कर्स’  चा आकडा वाढून येत असल्याचे दिसते आहे.     

या गेल्या काही दिवसात घरच्या व ऑफिसच्या सहकाऱ्यांच्या व्यतिरिक्त ज्यांना मदत पाहिजे आहे अशा आपसातल्या पन्नास-साठ लोकांचे ब्लड रिपोर्टस मी अभ्यासले  आहेत. ज्यांच्या फुफ्फुसांमध्ये करोनाचा शिरकाव झाला आहे  व त्यात अगदी 6 असा कमी स्कोअर आहे त्याही रुग्णांच्या बाबतीत या ‘मार्कर्स’ च्या व्हॅल्युज वाढलेल्या दिसून येत आहेत. पण यापैकी कुणाच्याच रक्तात अजून तरी गुठळ्या तयार झाल्याचे निदर्शनास आलेलं नाही. 

करोना जंतूचा आत शिरकाव झाल्यावर हा कुठल्याही रक्त  वाहिनीला इजा करू शकतो म्हणून तिथे पंक्चर दुरुस्त करण्यासारखी जी ‘क्लॉट’ तयार करण्याची आपल्या शरीराची नैसर्गिक ‘डिफेन्स सिस्टिम’ असते, ती यंत्रणा कार्यरत होऊन त्यामुळे या व्हॅल्युज वाढलेल्या येऊ शकतात, ही शक्यता पण याबाबतीत विचारात घेतली पाहिजे असं मला वाटतं. 


*(६) अल्टरनेटिव्ह थेरेपीज :


मी घरी उपचार करत असलेल्या 5 रुग्णांना व तसेच हॉस्पिटल मधे अॅडमिट न झालेल्या माझ्या सहकाऱ्यांना व तसंच आणखी काही ओळखीच्या रुग्णांना, आयुर्वेदात पीएचडी असलेले अत्यंत अभ्यासू डॉक्टर देवपुजारी यांचा सल्ला घेऊन न्यूमोनॉर्म, पी-५, खोखो, गिलोय गुग्गुळ व ज्वारमेट ही आयुर्वेदाची ५ औषधं दिवसातून तीनदा दिलीत. हे सगळेच रुग्ण सध्या बरे आहेत. हा त्यांच्या रोगप्रतिकारक शक्ति, वाफ घेण्याचा आणि गार्गल्स नियमित करण्याचा परिणाम असू शकतो किंवा या आयुर्वेदिक औषधांची पण त्यांना काही मदत झालेली असू शकते. 

माझा स्वतःचा आयुर्वेदावर विश्वास आहे. इतर कुणाचा तो नसला तर त्यांनी तो ठेवावा असा माझा आग्रह नाही. पण ॲलोपॅथी मधे करोनासाठी काहीच औषध सध्या नसताना दुसरा काहीच ‘साइड इफेक्ट’ नसलेल्या आयुर्वेद, होमियोपॅथी, निसर्गोपचार अशा ‘अल्टरनेटिव्ह थेरपीज’ ची पण आपल्या स्वतःच्या रोगप्रतिकारक शक्तीला जोड देण्यास काहीच हरकत नसावी असं मला वाटतं.   

              

*७) सरकार:*  


मागच्या वर्षीपासून आपल्याला सांगितल्या जात असलेली माहिती म्हणजे करोनाच्या संसर्गाचा 80 टक्के लोकांना काहीच त्रास होत नाही, 10 टक्के लोकांना सर्दी, खोकला, ताप वगैरे असा त्रास होऊन ते तीन-चार दिवसात बरे होतात, 10 टक्के लोकांना हॉस्पिटलला ॲडमिट करावं लागतं व यातले 1½ टक्के लोकं मरतात ही आहे. करोनाचा प्रसार रोखणं शक्य होत नाही आहे व त्यासाठी त्याच्यावर उपचार करण्याच्या उपाययोजनांचीच तयारी ठेवणं आवश्यकच, हे पण मागच्या वर्षीपासूनच आपल्याला कळतं आहे. 

130 कोटी जनतेच्या देशात 10 टक्के म्हणजे 13 कोटी लोकांना हॉस्पिटलायझेशनची गरज पडू शकते हे आपल्याला मागच्या वर्षीपासूनच माहीत आहे. यांना ऑक्सिजन किती लागू शकतो याचा अंदाज काढणंही सहज शक्य आहे. मग 1 वर्ष लोटून जाऊन, आता आलेल्या परिस्थितीसाठी सध्या आपली काहीच तयारी नाही असं का आहे ?? 

आपल्या जवळ एवढी हॉस्पिटलस् नाहीत हे आपल्याला तेव्हाच माहीत होतं. शाळा, कॉलेज, होस्टेल्स अशा लॉकडाऊन मधे जवळपास बंदच असलेल्या इमारतींमध्ये तात्पुरती हॉस्पिटल्स उभी करणे, खासगी क्षेत्रांना कोविड हॉस्पिटल्स उघडायला ‘फास्ट ट्रॅक अप्रुव्हल’, सबसिडी, टॅक्स मधे सूट अशा काही योजना आखणे,  मेडीकल, नर्सिंग, पॅरामेडिकलच्या अन्डर ग्रॅजुएट च्या विद्यार्थ्यांना कोविड ट्रेनिंग देऊन येऊ शकणाऱ्या आपत्तीत त्यांचाही उपयोग होऊ शकेल इतपत सुशिक्षित, सुसज्ज ठेवणे, अॅम्ब्युलेन्स साठी कर्ज, रोड टॅक्स माफी, छोट्या ऑक्सिजन प्रकल्पांसाठी ‘इन्सेटीव्हज्’ अशा उपाययोजना या गेल्या वर्षभरात का करण्यात आल्या नाहीत? आता तहान लागल्यावर विहीर खोदण्यासारखं आपण ऑक्सिजन तयार करण्याचे नवीन प्रकल्प जाहीर करत आहोत हे आधीच का करण्यात आलं नाही ??              1

सुरुवातीच्या काळात खासगी दवाखान्यात कोरोना रुग्णांना ट्रीटमेंट करण्यापासून मनाई करण्यात आली होती. नंतर त्यांना ती परवानगी देण्यात आली आणि आता तर करोनासाठी बेड ठेवणे त्यांना ‘कम्पल्सरी’ करण्यात आलेले आहेत. सुरुवातीला खासगी हॉस्पिटल ना1 करोंनाच्या लढाईत सहभागी न करून घेण्यामागे सरकारचं काय तर्कशास्त्र होतं हे कोणी सांगू शकेल का?  सुरुवातीपासूनच या खासगी रुग्णालयांना विश्वासात घेतलं असतं तर या वर्षभरात त्यांची क्षमता अधिक वाढून आता आलेली परिस्थिती कितीतरी अंशी कमी झाली असती.   

आता हॉस्पिटल मधे बेडस् नाहीत, ऑक्सिजन नाही, औषधं नाहीत, स्टाफ नाही. अशी परिस्थिती आल्यावर, ‘लोकं नियम पाळत नाहीत म्हणून अशी परिस्थिती आली’ असं लोकांच्याच डोक्यावर खापर फोडताना सरकार म्हणून आपण सततचे लॉक-डाऊन जाहीर करण्या व्यतिरिक्त गेल्या वर्षभरात काय केलं याचं आत्मपरीक्षण सगळ्याच सरकारांना करावसं वाटत नाही आहे  का...???? 


*८) विलगीकरण, हॉस्पिटलायझेशन वगैरे:*


घरातल्या कुणाची RTPCR  टेस्ट पॉझिटिव्ह आल्याबरोबर बहुतांशी कुटुंबातले लोक स्वतःच घाबरून जाऊन त्या रुग्णाला अजून घाबरवतात. भीतीनी अर्धमेला झालेल्या रुग्णाचं मन खचून त्याची रोगप्रतिकारक शक्ती मग अजूनच कमी होत असेल. अशा वेळी जेवणाचं ताट त्या रुग्णाच्या खोलीत बंद दारातून आत  सरकवणे किंवा त्यांला सरळ रुग्णालयात भरती करून स्वतःच्या सुरक्षेचा सुटकेचा श्वास सोडणे असं काही करण्याकडे बहुतांशी लोकांचा कल असतो. हे अतिशय अमानुष आहे. मरणाच्या भीतीपोटी आपण आपली माणुसकी सोडू नये असं मला वाटतं. 

 हॉस्पिटल मधे अॅडमिट नाही करायचं हा निर्णय घेतल्यावर मी माझ्या कडे काम करणाऱ्या तीनही माणसांना त्यांच्या घरून सामान आणायला लावून माझ्या घरातच एक-एक खोली  राहायला दिलेली आहे. ते तीन व माझ्या घरचे दोन अशा पाच लोकांची सुश्रुषा मी व माझी पत्नी मनीषा गेल्या काही दिवसांपासून करत आहोत. त्यांच्या खोलीत जाताना डबल मास्क घालणे व ब्लड प्रेशर, शुगर वा ऑक्सिजन घेताना त्यांच्या शरीराला आपला स्पर्श झाल्यास बाहेर आल्यावर साबणाने हात धुणे एवढीच काळजी आम्ही या बाबतीत घेत आहोत. पी.पी.ई. किट वगैरे आम्ही कधीच घातलेली नाही. ‘नुट्रोफील्स’ आणी ‘प्लेटलेट्स’ वाढणे, लिंफोसाईटस् कमी होणे ईओसिनोफेलिया  वाढणे, अशी इन्फेक्शनची सुरुवातीची लक्षणे सोडल्यास अजून तरी आम्हा दोघाना फारसा गंभीर संसर्ग झाल्याची लक्षणं आलेली नाहीत. आम्ही नियमितपणे आमच्या रक्ताच्या तपासण्या करून घेत आहोत. करोना बरोबरची आमची ‘लिव्ह इन रीलेशनशिप’ आता पर्यंत तरी व्यवस्थित चाललेली आहे.   

बऱ्याच वर्षांपासून सवय तुटलेलं स्वतःची कामं स्वतः करण्याचं स्वावलंबन हे त्रासाचं तर आम्हाला मुळीच गेलेलं  नाही, उलट सुखद अनुभव देणारं ठरलं आहे. हे स्वावलंबन व आप्तांची सेवा, सुश्रुषा हेच या आत्यंतिक  ताणाच्या दिवसांत ‘रिलीफ’ देणारं ठरतं आहे. भीतीने अर्धमेले झालेल्या लोकांमधे आपलं जाळं पसरवणं करोनाला आणखी सोपं जात असेल व त्यामुळे  दवाखान्यात भरती होऊन एकटं न पडता आपल्या माणसांचा सहवास मिळत राहिला तर त्या रुग्णाची रोगप्रतिकारक शक्ति वाढण्यास पण मदत होऊन त्याची करोना विरुद्धची लढाई अधिक सोपी होत असेल. 


*९) करोनाचा जंतू :


 जितकी त्याच्या बाबत ‘हाइप’ केल्या गेली आहे तितका करोना हा काही कर्दनकाळ, राक्षसी जंतू नाही. ‘झपाट्यानी पसरणं’ हा अवगुण सोडला तर गेल्या 20 वर्षात आलेल्या फ्लूच्याच ५-६ इतर जंतुपेक्षा याचा ‘मृत्यू दर’ फारच कमी आहे, ही नशिबाची खूप मोठी बाब आहे. आपल्यापैकी ९० टक्के लोक त्याच्यावर लीलया विजय मिळवीतच आहेत व ८.५० टक्के लोक थोड्या कष्टाने का होईना पण शेवटी विजय मिळवीतच आहेत. आपलं उणपुरं १४ दिवसाचं लाभलेलं आयुष्य जगण्यासाठी परजीवी असल्यामुळे दुसऱ्याच्या शरीराचा आसरा शोधणे आणि या काळात जमेल तितकी आपली प्रजा वाढवणे या पलीकडे या जंतूचा दुसरा काही ‘डीसट्रक्टीव्ह अजेंडा’ अजून दिसलेला नाही आहे. ‘सर्व्हायव्हल इनस्टींक्ट’ व प्रजनन हा वनस्पतींपासून सगळ्याच जीवमात्रांमधे निसर्गत:च असतो तोच आणि तेवढाच ‘नॅचरल इनस्टींक्ट’ त्याच्यात आहे. त्यामुळे सीटी स्कोअर २५ येऊन ७५ टक्क्यांच्या वर फुफ्फुस निकामी होऊन व्हेंटीलेटरवर असलेल्या लोकांचाही १६ व्या दिवशी आरटीपीसीआर नीगेटीव्ह येतो आहे व मग व्हेंटीलेटर ते बायो-कॅप ते साधं ऑक्सिजन असा परतीचा प्रवास करत तेही लोक बरे होतात आहेत.          

‘जिओमेट्रिक प्रोग्रेशन’ नी करोनाचं ‘रिप्लीकेशन’ होतं असं  म्हणतात तर मग १४ व्या दिवशी त्यांनी ‘रिप्लीकेट' केलेले जंतू शरीरात आणखी पुढे १४ दिवस का नाही राहात आहेत? त्याचा अर्थ मधमाशांमधे ‘राणी माशी’ एकच असते व तीच पोळं तयार करू शकते तसं करोनामधे काही ‘राणा करोना’ असत असावेत  व तेच फक्त आपलं कुटुंब वाढवू शकत असावेत, असं असेल कां? आणि म्हणून १४ व्या दिवशी त्यांच्या कुटुंबासहित त्यांचा अवतार समाप्त होत असेल का? आपल्या अॅंटीबॉडीजची संख्या त्या जंतूपेक्षा जास्ती व्हायला १४ दिवसांचा कालावधी लागतो असाही एक कयास या बाबतीत बांधणं शक्य आहे. पण हे खरं असलं तर ज्याच्या त्याच्या रोगप्रतिकारक शक्ती-प्रमाणे हा काळ मग कमी जास्त यायला पाहिजे. सगळ्यांच्याच बाबतीत तो नेमका १४ दिवसांचाच कसा येऊ शकतो? त्या अर्थी या जंतूंचं नैसर्गिक आयुष्यच १४ दिवसांचं असेल या शक्यतेचा विचार करणच जास्त संयुक्तिक आहे. असं असेल तर हा 

‘ राणा  करोना’ आपल्या शरीरात शिरल्यावर त्याला तिथेच मारण्यात ८० टक्के लोक यशस्वी होत असावेत म्हणून त्यांना काहीच लक्षणं येत नाहीत, हा आत शिरतो तेव्हाच नेमकी ज्या लोकांची अपुरी झोप, रिकामं पोट अशी ईम्युनीटी ‘कॉम्प्रमाइज्ड’ असते त्या १० टक्के लोकांना सर्दी, खोकला ताप असा त्रास होत असावा, या पहिल्या ५-६ दिवसांत ज्यांनी हयगय केली किंवा ज्यांच्यावर अतिरेकी औषधांचा मारा झाला यांच्यापैकी काहींमधे  इन्फेक्शन वाढून त्यांना अॅडमिट करावं लागत असावं व यांच्यामधे ज्यांना ‘कोमॉरबीडिटीज’ असतील अशांचा तो दूसरा रोग उचल खाऊन (उदा. फुफ्फुस, किडनी, कॅन्सर इत्यादि) त्या त्यांच्या मूळ रोगानी ते 1½ टक्के लोक मग मरत असावेत, असही असू शकतं. फुफ्फुस करोनानी पूर्णपणे खाऊन टाकलीत म्हणून कुणीच मरत नाहीत आहे. उलट करोना ज्याच्या फुफ्फुसात ज्या भागात राहून गेला त्या सीटी स्कोअर ९, १२, २२ आलेल्यांचेही फुफ्फुसांचे ते भाग २-३ महिन्यात पूर्ववत काम करायला लागले आहेत, ही खूप 'एनकरेजिंग’ बाब आहे. करोनानंतर ‘फायब्रोसिस’  होऊन फुफ्फुसांचा काही भाग कायम स्वरूपी निकामी होण्याच्या घटना अतिशय दुर्मिळ आहेत. या केसेस चा ‘केस टु केस’ अभ्यास केला पाहिजे. करोनानंतरची फीजिओथेरेपी व्यवस्थीत न करणे अशीही  त्याची काही कारणं असू शकतात. 

त्यामुळे करोना झाला म्हटल्यावर भीतीने अर्धमेले होऊन आपण स्वतःची अर्धी आत्महत्या करून घेऊ नये, हे माझं कळकळीचं सांगणं आहे. मानवाची इच्छाशक्ती, कर्तृत्वशक्ती व जिद्द प्रचंड आहे. त्याच्या समोर हा व्हायरस चिल्लर आहे. तरीही स्वार्थानी बरबटलेल्या सगळ्या व्यवस्थांमुळे ‘एक साला व्हायरस आदमीको हिजडा बना देता है’. अशी आपली सध्या स्थिति झाली आहे.           

पुढच्या वर्षी आपण सध्या डेंग्यूला घाबरतो तितकंच कदाचित करोनाला घाबरू व आणखी १-२ वर्षात ‘हर्ड इम्युनिटी’ येऊन याला दर सीजन मधे सर्दी-खोकल्यासारखा अंगा खांद्यावर खेळवू शकू. त्याआधीच येत्या ६ महिन्यात अमेरिकेच्या फायझर कंपनीचं करोनावर औषध किंवा निरुपद्रवी केलेल्या करोना जंतुला सरळ रक्तात  प्रवेश देणाऱ्या सध्याच्या लशीं ऐवजी नाकात थेंब टाकण्याची ‘नेझल ड्रॉप्स’ वाली चीन मधे आली आहे तशी लस निघाली तर या संकटातून आपण त्या आधीही बाहेर पडू शकतो.   

सध्याच्या कसोटीच्या परिस्थितीत जगताना आपलं मनोधैर्य हीच कामात येणारी सर्वात मोठी ताकद आहे व ते स्वतःच टिकवणं व इतरांचं वाढवत राहणं हे आपल्यापैकी प्रत्येकानी सतत करत राहायला पाहिजे, हे हात जोडून सांगतो.   

  

*(१०) सारांश :


सध्याची ही भीषण परिस्थिती, करोनामुळे २५ टक्के तर ७५ टक्के सर्वपक्षीय नेतृत्वामधे द्रष्टेपणा तर सोडाच पण दूरदर्शीपणा सुद्धा नसणे, शासकीय यंत्रणांचा गलथानपणा, आरोग्य यंत्रणांची सध्याची ‘ट्रायल अँड एरर’ परिस्थिती, या क्षेत्रातल्या काही टक्के लोकांची बाजारू वृत्ती, अतिरेकी औषध योजना, फार्मासुटिकल कंपन्यांना विकल्या गेलेल्या जगातल्या आरोग्य संघटना, या कारणांमुळे उद्भवलेली आहे असं माझं स्पष्ट मत आहे. 

1½ टक्के सांगितला जाणारा मृत्यू दर सध्याच्या भीषण परिस्थितीत नक्कीच वाढून ५-६ टक्के झालाच असेल. यातले 1½ टक्के मृत्यू करोनाचे आहेत व बाकी ४-५ टक्के हे या सगळ्या व्यवस्थांनी केलेले निर्घृण खून आहेत. प्रत्येक संवेदनशील मनावर या मृत्यूंचे आसूड उमटतात आहेत. यांच्या उद्वेगानी या सगळ्याच व्यवस्था उलथवणारी ‘संपूर्ण क्रांति’ आली तरच हे सगळे मृतात्मे हुतात्मे ठरतील.        

येत्या काळात मरणाऱ्या ५-६ टक्के लोकांमधे माझाही नंबर लागू शकतो ही शक्यता नाकारण्या इतका मी मूर्ख नाही. आणि यदाकदाचित तसं काही झालं आणि पुढचं बोलायला मी नसलो तरी याबाबतीत माझं हेच मत राहील हे मला आज ठामपणे नोंदवून ठेवायचं आहे. आणि Last but not the least, मरणाच्या 1½ टक्के शक्यतेच्या भीतीपायी जगणं सोडणं किंवा  माणुसकी सोडणं हे अगदीच अयोग्य आहे, हे मला शेवटी आवर्जून सांगायचं आहे.     

-- आशुतोष शेवाळकर,

   नागपूर  

* * * * *


--------WHATSAAP COLLECTION----------


Thursday, 29 July 2021

सन २०२०-२०२१ च्या डी.सी.पी.एस. पावत्यां ब्लॉग मध्ये दिलेल्या लिंक वर क्लिक करून चेक करा.

 


सध्या पे युनिट चंद्रपूर येथे सन २०१२-२०१३ पासून सन २०२०-२०२१ पर्यंतच्या  डी.सी.पी.एस. पावत्यांचा ताळमेळ (हिशोब) जुळविणे सुरु आहे. त्या करीता लिपिक वर्गाला थोडी मदत म्हणून सन २०२०-२०२१ च्या डी.सी.पी.एस. पावत्यां चेक करण्याकरिता खाली एक्सएल शीटची लिंक देत आहो. 

त्यावर क्लिक करून एक्सेल शीट डाउनलोड करा व त्यातील पिवळ्या सेल मधील माहिती भरून सन २०२०-२०२१ च्या डी.सी.पी.एस. पावत्यां चेक करा. 



LINK         ->      2020-2021 DCPS Reciepts



(टीप :- सदरच्या लिंक मधील डाउनलोड केलेली एक्सेल शीट ही पे युनिट चंद्रपूर यांनी प्रकाशित केलेली नसून, स्वतः फॉर्मुले लावून बनविलेली आहे, त्यामुळे एक्सेल शीट ही पे युनिट चंद्रपूर यांचे कडून ग्राह्य धरण्यात येणार नाही. कोणीही त्याची प्रिंट घेतल्यास त्यास ते स्वतःच जबाबदार असतील. सदरच्या एक्सेल शीट मधील आलेले रिझल्ट हे बरोबरच असतील असे नाही. पण जवळपास रिझल्ट आणण्याचा हा माझा प्रयत्न आहे. )



आपल्या काही सूचना असल्यास कृपया कॉमेंट बॉक्स मध्ये द्याव्यात. 

आपल्या सूचना स्वागतार्ह्य आहेत. 




Monday, 19 July 2021

पद आणि कर्तव्य.

 *पद* 

कोणत्याही माणसाचे महत्व *पद* मिळाल्यामुळे कधीच वाढत नाही, तो किती कार्यक्षम, कर्तृत्व,नेतृत्व दाखवतो...  यावरच त्याचे खरे व्यक्तीमत्व समाजाला समजते, कर्तृत्वच नसेल आणि *पद* मिळाल्यामुळे अहंपणा, स्वार्थपणा,लबाडी व गर्व चढला असेल तर कालांतराने निश्चितच त्याचा गर्व खाली होतो.


*पदामुळे* तात्पुरते महत्व वाढते, पण चांगल्या कर्तृत्वामुळे आयुष्यभर महत्व राहते. 


*पदामुळे* आपल्यावर असलेली जबाबदारी व्यवस्थित  वेळ देऊन पार पाडली पाहिजे, चांगली माणसं बरोबर घेऊन त्या क्षेत्रात यश मिळवले पाहिजे,ज्यांनी तुमच्यासाठी त्याग केला आहे, त्यांची जाणीव कायमच ठेवली पाहिजे, 


*पद* कधी तरी जाणारच असते, पण पद गेल्यावरही आपली किंमत कायम राहिली पाहिजे असे माणसांशी वागले पाहिजे 

नाहीतर हाच समाज तुमची कार्यक्षमता,कर्तृत्व,वागणं, प्रामाणिकता व बोलणं पाहत असतो,ऐकत असतो आणि सहनही करत असताे,मात्र लबाडीसह स्वार्थीपणा वाढला तर योग्य वेळ आल्यावर तुमची किंमत रसातळाला जाऊन शून्य होते.


*म्हणूनच आपल्या माणसांशी, समाजाशी व विश्वासू मित्रांशी,  नीट वागा,नीट बोला व आपले कर्तृत्व निस्वार्थी व चांगले आहे हे काम करून सिध्द करा, तरच लोक तुमच्या सोबत राहतील...!*       


*संघटना व संघटित कार्यकर्ते यांना समर्पित* 


*रस्ता चुकणं चुकीचं नसतं, मात्र रस्ता चुकत  आहे हे समजून पण त्याच रस्त्याने चालत राहणे नक्कीच चुकीचं असतं...

*🙏🏻🤝🏻🙏🏻🤝🏻🙏🏻🤝🏻🙏🏻*

व्हाटसॅप कलेक्शन......... 


Sunday, 18 July 2021

*कौतूकाची थाप कुठेच कमी पडायला नको*



यावर्षीचा दहावीचा रिझल्ट लागला आणि पहिल्यांदाच करोनाच्या कृपेने एका अनोख्या रिझल्टला विद्यार्थी आणि पालक सामोरे जात आहेत. परीक्षा न घेताच फक्त अंतर्गत मूल्यमापनानुसार हा निकाल लावला गेला आहे त्यामुळे या निकालाला एक ऐतिहासिक महत्व प्राप्त झाले आहे. 

परिक्षा न घेताच निकाल घोषित झाल्यामुळे या निकालाला काहिसे थट्टेचे स्वरूप प्राप्त झाले आहे. कोविड बॅच, लॉटरी रिझल्ट, मार्कांची खैरात, बिनविरोध पास अशी शेरेबाजी सुरू झाली आहे. Whatsapp वर अशा अनेक मीम्स, वात्रट  विनोद यांचा भडीमार होत आहे.  या शर्यतीत लंगड्या घोड्यांनीही बाजी मारलेय त्यामूळे पेढे वगैरे वाटून, कौतुक करण्यासारखे विशेष काहि नाहि अशी कुजकट बोलणी करणारेही काहि महाभाग आहेत. अशावेळी ज्यांनी करोनाच्या या महासंकटात, अत्यंत विपरीत परिस्थितीत, भांबावलेल्या मनस्थितीत, आयुष्यातील एका महत्त्वाच्या परिक्षेचा अगदि जीव तोडून अभ्यास केला आहे त्या प्रामाणिक कोवळ्या मनांवर अशाप्रकारे खिल्ली उडवून आघात करणे योग्य नाहि याची जाणीव सर्वांनी ठेवायला हवी. 

       करोनाच्या या महाभयंकर संकटाला आपला देश आणि सर्व जग पहिल्यांदाच सामोरे जात आहे. कित्येक गोष्टी या test and trial basis वर केल्या जात आहेत कारण या अशा विपरीत परिस्थितीत नेमक्या काय योजना आखाव्यात, कशा प्रकारचे नियोजन करावे याचा पुर्वानुभव कोणालाच नव्हता  त्यामुळे प्राप्त परिस्थितीत सरकारने हा जो काहि निर्णय शालांत परिक्षेच्या बाबतीत घेतला आहे तो योग्यच म्हणायला हवाय. दुसरा काहि पर्यायच नव्हता. मुलांच्या सुरक्षेला प्राधान्य देणे अगदि योग्यच आहे. 

इकडे आड तिकडे विहिर अशी परिस्थिती सर्वांचीच होती. दहावी - बारावी सारख्या महत्त्वाच्या वर्षात करोनाचे महासंकट उभे राहिले होते. घराच्या बाहेर पडणे मुश्किल झाले होते. शाळा अनिश्चित काळासाठी बंद झाल्या होत्या. परीक्षा नेमक्या कशा घेतल्या जातील याची काहिच पुर्वकल्पना विद्यार्थ्यांना आणि पालकांना तसेच शिक्षकांनासुद्धा नव्हती. सर्वच गोंधळाचे वातावरण होते. online अभ्यासात अनंत अडचणी होत्या. शेवटि प्रत्यक्ष वर्गात बसून, शिक्षकांच्या मार्गदर्शनाखाली आणि सहकारी मित्रांच्या सहवासात केलेला अभ्यास आणि घराच्या एका कोपऱ्यात बसून मोबाईलच्या छोट्याशा स्क्रीनवर यापूर्वी कधिही न अनुभवलेला असा अभ्यास यामध्ये खूपच फरक आहे. या अभ्यासाला सरावण्यासाठीच मुलांना काहि काळ लागला. या महत्वपूर्ण परिक्षेत उत्तम गुण मिळविण्याचे दडपण मुलांवर असतेच त्यात हि अशी विपरीत परिस्थिती.... अशावेळी मुलांची मानसिक स्थिती काय असावी याचा अंदाज न केलेलाच बरा. शहरातील मुलांना तरी त्यातल्या त्यात बऱ्यापैकी सुविधा उपलब्ध असतात पण गाव खेड्यातील मुलांच्या अभ्यासाची तर पार दैना उडाली आहे पण दोष तरी कोणाला द्यायचा ?  काहि अपवाद वगळले तर बरेचसे विद्यार्थी प्रामाणिक प्रयत्न करत होते. शिक्षकांचे प्रत्यक्ष मार्गदर्शन मिळवण्यात अडचणी असल्याने यूट्यूबवर उपलब्ध असलेल्या काही शैक्षणिक सुविधांचा पर्याय शोधला जात होता. जमेल त्याप्रकारे विषय समजून घेण्यासाठी प्रयत्न केले जात होते कारण कुठल्याही स्वरूपात परीक्षा होणारच हिच धारणा होती. त्यासाठी जीव तोडून अभ्यास केला जात होता. शाळांमधून घेतल्या जाणाऱ्या विविध अंतर्गत चाचण्यांना प्रामाणिकपणे सामोरे जावे लागत होते. त्यामुळे मुलांच्या या प्रामाणिक प्रयत्नांना, मेहनतीला दाद द्यावीच लागेल. परीक्षा घेतल्या जाणार नाहित हा निर्णय अगदि शेवटी घेतला गेला होता त्यामुळे मुलांनी आता मिळवलेले गुण हे फुकटचे आहेत असे कोणीहि म्हणू नये. या वर्षातील त्यांची मानसिक स्थितीसुद्धा लक्षात घ्यावी. काहि दुर्दैवी मुलांनी तर जॉब घालवून घरात बसलेले बाबा, कोविड सेंटरमध्ये १५ दिवस विलगीकरणात गेलेले पालक, जवळचे  गमावलेले नातेवाईक असे आघातसुद्धा सहन केले होते. 

      अशा एकूण परिस्थितीत सर्व यशस्वी विद्यार्थ्यांचे कौतूक केलेच पाहिजे. नेहमीप्रमाणे प्रत्येक विद्यार्थ्यांचे योग्य मुल्यमापन कदाचित झाले नसेलहि परंतु या मिळवलेल्या गुणांचे महत्व त्यामुळे कमी होत नाहि. काहींना अपेक्षेहून जास्त तर काहि प्रामाणिक कष्ट केलेल्या मुलांवर अन्यायसुद्धा झाला असेल पण प्राप्त परिस्थितीत दूसरा कोणता ईलाजहि नाहि हे सुद्धा समजून घेतले पाहिजे. या कोवळ्या मनांना उभारी देण्याचे काम आपणच करायला हवे. त्यांच्या मनात कोणताहि प्रकारचा न्यूनगंड निर्माण होणार नाहि याची काळजी आपण घेतली पाहिजे. त्यांच्या पुढील यशस्वी कारकिर्दीसाठी त्यांना शुभेच्छा द्यायला पाहिजे. कौतूकाचा पेढा त्यांच्या तोंडात भरवलाच पाहिजे आणि त्यांच्या पाठीवर पडणारी कौतुकाची थाप कुठेही कमी पडणार नाहि याची काळजी सुद्धा घ्यायलाच पाहिजे. 

----WHATSAPP COLLECTION----

👍💐

Friday, 9 July 2021

सकारात्मक ऊर्जा ।

 एक राजा के पास कई हाथी थे, 

लेकिन एक हाथी बहुत शक्तिशाली था, बहुत आज्ञाकारी,समझदार व युद्ध-कौशल में निपुण था। 

बहुत से युद्धों में वह भेजा गया था और वह राजा को विजय दिलाकर ही वापस लौटता था....

इसलिए वह महाराज का सबसे प्रिय हाथी था। 


समय गुजरता गया  ..


और एक समय ऐसा भी आया, जब वह वृद्ध दिखने लगा।


                     

 अब वह पहले की तरह कार्य नहीं कर पाता था।

इसलिए अब राजा उसे युद्ध क्षेत्र में भी नहीं भेजते थे।


 एक दिन वह सरोवर में जल पीने के लिए गया, लेकिन वहीं कीचड़ में उसका पैर धँस गया और फिर धँसता ही चला गया। 


उस हाथी ने बहुत कोशिश की, लेकिन वह उस कीचड़ से स्वयं को नहीं निकाल पाया।


 उसकी चिंघाड़ने की आवाज से लोगों को यह पता चल गया कि वह हाथी संकट में है।


हाथी के फँसने का समाचार राजा तक भी पहुँचा।

 

                       राजा समेत सभी लोग हाथी के आसपास ईकट्ठे हो गए और विभिन्न प्रकार के प्रयत्न उसे निकालने के लिए करने लगे।


लेकिन बहुत देर तक प्रयास करने के उपरांत कोई मार्ग नहीं निकला..


तभी गौतम बुद्ध मार्गभ्रमण कर रहे थे। राजा और सारा मंत्रीमंडल तथागत गौतम बुद्ध के पास गये और अनुरोध किया कि आप हमें इस विकट परिस्थिति में मार्गदर्शन करें गौतम बुद्ध ने सबसे पहले घटनास्थल का निरीक्षण किया और फिर राजा को सुझाव दिया कि सरोवर के चारों और युद्ध के नगाड़े बजाए जाएँ।


सुनने वालों को विचित्र लगा कि भला नगाड़े बजाने से वह फँसा हुआ हाथी बाहर कैसे निकलेगा। जैसे ही युद्ध के नगाड़े बजने प्रारंभ हुए, वैसे ही उस मृतप्राय हाथी के हाव-भाव में परिवर्तन आने लगा। 


पहले तो वह धीरे-धीरे करके खड़ा हुआ और फिर सबको हतप्रभ करते हुए स्वयं ही कीचड़ से बाहर निकल आया।

गौतम बुद्ध ने सबको स्पष्ट किया कि हाथी की शारीरिक क्षमता में कमी नहीं थी, आवश्यकता मात्र उसके अंदर उत्साह के संचार करने की थी।


जीवन में उत्साह बनाए रखने के लिए आवश्यक है कि मनुष्य सकारात्मक चिंतन बनाए रखें और निराशा को हावी न होने दें...

 कभी – कभी निरंतर मिलने वाली असफलताओं से व्यक्ति यह मान लेता है कि अब वह पहले की तरह कार्य नहीं कर सकता, लेकिन यह पूर्ण सच नहीं है.....

 

 "सकारात्मक सोच ही आदमी को "आदमी" बनाती है....

उसे अपनी मंजिल  तक ले जाती है...।।


 आप हमेशा सकारात्मक ऊर्जा से परिपूर्ण , स्वस्थ एवं प्रसन्न रहें...।। 

------------     Whatsaap Collection   ------------

Thursday, 1 July 2021

भारतीय राजकारणी.

 ५४५  खासदार 

२४५  राज्य सभा खासदार

४१२०  देशातील आमदार


यांनी प्रत्येकी ५ लाख रुपये जरी दिले तर  २,४५५,०००,०००, लाख

२ अरब  ४५  कोटी ५० लाख रुपये जमा होतील


यात आजी - माजी  खासदार आमदार हे जर पुढे आले तर

भारतीय अर्थ व्यवस्था पण मजबुत होईल 

 

आता वेळ या राजकारणी लोकांची आहे, जनतेसाठी कोण कोण पुढे येतं हे पाहण्याची

निवडणूकीत करोडो लाखो खर्च करणारे जनते साठी पुढे या 

       

अशी विनंती भारतीय नागरीक म्हणून  करीत आहे.

          

मी हा मेसेज माझ्या सर्व ग्रुपवर टाकला आहे. 


 जर ह्या सर्व लोकांनी होकार दिला तर आपण सर्व आम जनता आपापल्या परीने देशासाठी नक्कीच मदत करील आता अजिबात शंका नाही.


सर्वात पहिली शरद पवार साहेबांनीआपल्या पासून सुरुवात करावी. मग उद्धव साहेबांनी सर्वांना आदेश द्यावा की महाराष्ट्रातील सर्व आजि माजी विधानसभा व राज्यसभा सदस्यांनी प्रत्येकी 5 लाख रुपये CM फंडात जमा करावे. मग बघा अवघा महाराष्ट्र कसा पुढे येतो ते... सुरुवात महाराष्ट्राने करावी.




आमदार खासदार चे लाड बंद करण्यासाठी सर्वोच्च न्यायालयात एक पीआयएल दाखल केला आहे, तो आपल्या मूल्यांकनासाठी पाठवित आहे ....

प्रिय भारताचे सन्मानिय  नागरिक बंधु-भगिनींनो ...

आपणास हा संदेश वाचण्याची विनंती केली गेली आहे. आणि आपण सहमत असल्यास, कृपया आपल्या संपर्कातील सर्व लोकांना पाठवा आणि त्यानंतर त्या प्रत्येकास पुढे पाठवण्याची विनंती करावी.........,. तीन दिवसांत हा संदेश संपूर्ण भारत भर पसरला पाहिजे, प्रत्येक नागरिकाने आवाज उठवावा,__

01) सर्व आमदार, खासदारांना पेंशन मिळू नये. कारण राजकारण म्हणजे नोकरी नाही. त्यामुळे नोकरी नाही तर वेतन नाही. राजकारण हे लोक प्रतिनिधित्व कायद्याअंतर्गत एक निवडणूक प्रक्रियेचा भाग आहे, त्याच्या सदस्यत्वास कोणतीही सेवा निवृत्ती नाही, परंतु सध्या त्यांना 5 वर्षांच्या सदस्य परानंतर पेन्शन मिळते. यात आणखी एक मोठा गोंधळ असा आहे की जर एखादी व्यक्ती कौन्सिलर असेल तर मग तो विधायक बनतो आणि नंतर सदस्य बनतो, त्याला तीन-तीन पेन्शन मिळते पण सामान्य माणूस दोन ठिकाणी नोकरीही करू शकत नाही, देशाच्या नागरिकांशी हा एक मोठा विश्वासघात आहे त्यामुळे त्यांची पेन्शन त्वरित बंद करावी . 

02) सेंट्रल पे कमिशन ने, भारतीय संसदेच्या आमदार खासदारांचा भत्ता सुधारित करावा. पण ते नौकर नसल्याने त्यांचे वेतन बंद करावे . (सध्या ते स्वत: साठी मत मागतात स्वत:चे वेतन आणि भत्ते वाढवतात आणि त्या वेळी सर्व पक्षांच्या सदस्यांचे स्वर एकत्र येतात ,हे विशेष,. 

03) खासदारांनी त्यांच्या सध्याच्या आरोग्य सेवा सुविधा नाकारून भारतीय सार्वजनिक आरोग्य सेवेचां लाभ घ्यावा. आपल्या व्याधीवरील उपचार भारतात  केले जावे . विदेशात उपचार केले जाऊ नये, जर करायचेच झाले तर ते आपल्या स्वतःच्या खर्चाने करावे . 

4) मोफत सवलत, राशन, वीज, पाणी, फोन बिल सहित सर्व सेवांची समाप्ती केली पाहिजे. (त्यांना इतक्या सवलती कायद्याने मिळत नाहीत)

05) गुन्हेगार नेत्यांना निवडणूक लढण्यापासून बंदी असावी. संदिग्ध व्यक्तींकडे दंडनीय, गुन्हेगारी शुल्क आणि दृढनिश्चय, गुन्हेगारी रेकॉर्ड किंवा भूतकाळातील त्यांना झालेला दंड विचारात घेवून अशा सदस्यांवर बंदी घालणे आवश्यक आहे.  राजकारण्यांकडून आर्थिक नुकसान झाल्यास त्यांच्या कडून व त्यांच्या कुटुंबियांकडून, तसेच नामनिर्देशित व्यक्तींकडून त्याची भरपाई केली पाहिजे. 

06) खासदारांनी सामान्य भारतीय लोकांना लागू असलेल्या सर्व कायद्यांचे देखील पालन करावे. * 

07) संसद कँन्टीनमध्ये मिळणाऱ्या जेवणात सवलत देऊ नये,संसदेत लोकप्रतिनिधी या नात्याने स्थान आहे, लुटालुटी साठी आकर्षक करिअर नाही.

08) विनामूल्य रेल्वे आणि विमान प्रवास बंद करावा.

9) नेते मरे पर्यंत खुर्चीला चिकटून राहणार, आणि सामान्य माणूस वयाच्या ५८ किंवा ६० व्या वर्षी सेवानिवृत्त होणार? ह्याचीं बुध्दी वयोवृद्ध होऊन ही तल्लख रहाते आणि सामान्य माणूस कामाच्याही लायक रहात नाही? जर प्रत्येक व्यक्तीने कमीत कमी वीस लोकांना हा संदेश फॉरवर्ड केला तर भारतातील बहुतेक लोकांना हा संदेश पोहोचण्यासाठी फक्त तीन दिवस लागतील.आपणास असे वाटत नाही की, हा मुद्दा उठवण्याची ही योग्य वेळ आहे? जनतेच्या कामासाठी शासना कडे पैसा नसतो आणि आमदार , खासदार यांच्या लाड पुरविण्यासाठी जनतेची पैसा खर्च केला जातो आपण उपरोक्त मतांशी सहमत असल्यास, पुढे अग्रेषित करा.नसल्यास, हा संदेश हटवा. 

🔴 आपण माझ्या 20+ पैकी एक आहात, 

Monday, 28 June 2021

कोवीड - १९(कोरोना) आणि जागतिक बदल.......

 *तज्ञांच्या अंदाजानुसार येत्या १० वर्षात हे बदल होतील :-*


पूर्णवेळ कार्यालये पध्दत बंद होईल. त्यामुळे कमर्शियल कॉम्प्लेक्स मॉलप्रमाणेच बंद होतील. फुड होम डिलिव्हरी वाढेल व रेस्टॉरंटचा धंदा ६०% कमी होईल, ब्युटीपार्लर ही घरपोच सेवा होईल. 


घरपोच ऑनलाईन हेल्थ सेवा देणाऱ्या कंपन्या निघतील व मोठी फी घेणारे डॉक्टर व टोलेजंग हॉस्पिटलचे दिवाळं निघेल. 


शिक्षण ऑनलाईन होईल. भव्य ईमारती असणाऱ्या शिक्षण संस्था खंडर बनतील. त्यामुळे बहुसंख्य शिक्षकांच्या नोकऱ्या जातील किंवा कित्येक महिने पगारच मिळणार नाहीत. 


कोचिंगची पध्दती पूर्ण बदलून ती ऑनलाईन होईल. प्रायव्हेट ट्यूटर व इन्स्ट्रक्टर यांचे काम खूप वाढेल. शॉर्ट व कमी खर्चातील व उपयोगी शिक्षणाला महत्व येईल. 


सर्व राजकीय प्रचारप्रसार ऑनलाईनच असेल, रस्त्यावर भाषण, सभा, आंदोलने, मोर्चे इत्यादी मागास व खुळे समजले जातील. लोकांना उल्लू बनवायचा धंदा बंद होईल. 


बँकाचे सर्व व्यवहार मोबाईलवर होतील. तुम्हाला केव्हाही बँकेत जाण्याची गरज पडणार नाही. मागास, सहकारी बँका पूर्ण बंद होतील. 


चित्रपट हे मल्टिप्लेक्समध्ये पाहणे खूप कमी होईल. नवीन चित्रपटसुध्दा ऑनलाईन रिलीज होतील. टीव्ही पाहणे कमी होऊन सर्वजण मोबाईलवरच पाहतील. त्यामुळे टीव्ही चॅनेल तोट्यात जाऊन बरीच चॅनेल बंद होतील.


 जात, धर्म, वंश ह्या संकल्पना १५ वर्षात संपतील, पैसा व गुण ह्या आधारेच विवाह ठरतील. फक्त पैसे कमविणार्‍याचेच विवाह ठरतील बाकीचे वरातीत नाचायला व  मिरवणुकीलाच कामी येतील. 


नोकर्‍या हा प्रकार झपाट्याने कमी होईल, फक्त प्रोफेशनल असतील. ९०% कंपन्या आपली कामे आऊटसोर्स करतील, ह्या धंद्याला चांगले दिवस येतील. ९०% पेट्रोल, डिझेल गाड्या बंद होतील. इलेक्ट्रीक चार्जिंग गाड्या धावतील तेही तातडीची गरज असेल तरच.


*हे पुढील १५-२० वर्षात नक्कीच घडेल.  या आव्हानासाठी आपण तयार आहात का?*

*..............*

    काळानुरूप स्वतः ला बदला... नाहीतर काळ तुम्हाला बदलवून टाकेल  🙏🙏


-------- Whatsap Collection --------




Friday, 11 June 2021

विचार पुढच्या पिढीचा.............

 *चिंतनीय_लेख आहे, अजिबात राजकीय नाही, प्रत्येकाने आवर्जून वाचा...!!*


भारताची वाटचाल 👨‍🦯🧑‍🦯  निष्क्रिय भविष्याकडे....????

आपण कुठे चाललो आहोत...??



नुसतं राजकारण हे म्हणजे जीवन नाही... 


आपल्या भारत देशाला जर बलशाली राष्ट्र बनवायचे असेल तर जरा वेगळ्या पद्धतीने विचार करणे आता आवश्यक आहे...


उठा...!! जागे व्हा...!! 


आज बालवाडीपासूनच फुकटचा भात, अंडी, शिरा देउन बालमनापासूनच लाचारीची सुरुवात होते व पुढे तरूणपणी दहा रुपयांत जेवण १०० यूनिट्स मोफत, वीज फुकट, रेशन सरसकट,आवास योजनेंतर्गत निरर्थक सूट, ऊठसूठ कर्जमाफी ह्या गोष्टींची आशा लावून  सध्याच्या आणि पूर्वीच्या ही सरकारने आणू घातलेल्या या योजना समाजाच्या मानसिकतेवर अतिशय घातक परिणाम करून जाणार आहेत...


 देशात सध्या जवळपास ६७% लोकसंख्या तरुणांची हिच अवस्था आहे, हेच प्रमाणसंपुर्ण महाराष्ट्रात आहे...


ज्या वयात आपले भविष्य  घडवण्यासाठी कष्ट करायला हवेत त्या वयातल्या तरुणाला महिना ६०० रुपये दिले की जेवण, मोफत वीज, सरसकट कर्जमाफी दिली जाते...


अशाने  त्यांची विधायक  क्रयशक्ती  संपून जाणार आहे...    


यामध्ये अजून एक भयंकर गोष्ट म्हणजे असे की गेल्या १० वर्षापासून  इ. १ ली ते ८ वी पर्यंत परिक्षाच झालेली नाहीये....


९ वी साठी ही वर्गोन्नतीचे अलिखीत आदेश आहेत...त्यामुळे यापुढे तरूणपिढीचा भविष्यकाळ खूप कठिण असणार आहे...


ग्रामीण भाग असो किंवा शहरातील चौक बहुतांश ठिकाणी महागड़े Mobile, Bike, तोंडात गुटखा, अशी ही बहुतांश तरुणाई पार PM. कसा चुकीचा,CM. कसा चुकतो पासून गावातल्या फ्लेक्सवर आपला फोटो कोणत्या पोजमध्ये टाकायचा यासारख्या चर्चेत गुंतलेला असते...


आता हीच तरुणाई या फुकटचे दान वाटणाऱ्या राजकीय पक्षांच्या सतरंज्या उचलायला सहज उपलब्ध होते....


फुकट जेवण, फुकट वीज, थोडासा बेरोजगार भत्ता  फुकट रेशन  यामुळे एक अख्खी कर्तृत्ववान  पिढी बरबाद होणार आहे....


आजच्या तरुणाकडे आशिष्ठः, द्रढिष्ठाः,बलिष्ठाः,ही सामर्थ्य असायला हवीत, हा तरुण धेयवादी असावा तरच तो या गोष्टींना लाथ मारील व मला फुकटचे नको असे सांगेल...


सगळेच फुकट अशी सवय लागली की पुढच्या सरकारकडून हीच त्यांची अपेक्षा देखील राहणार....


कोणतीही गोष्ट आकाशातून फुकट पड़त नसते, या साठी लागणारा निधी जे ५-६ टक्के करदाते आहेत ते व शेवटी ते शेतकऱ्यांच्या मुळावर महागाईचे रुपात येऊन पडते....


स्विट्झजरलैंडमध्ये ३-४ वर्षांपूर्वी सर्व नागरिकांना सरकारने तिजोरीत शिल्लक असलेली गलेलट्ठ रक्कम दरमहा फुकट देऊ केली होती...


तेव्हा ७७% लोकांनी आम्हाला फुकटचा पैसा नकों, आमची क्रयशक्ती कमी होईल असे सांगून याला विरोध केला... 


आपल्याला स्विट्जरलैंडची सौंदर्य, सुबत्ता दिसते पण त्या मागे प्रत्येक नागरिकाची जिद्द कर्तव्यनिष्ठता आपण विसरतो...


आपल्याला जर खरच स्वतःला आणि भारत देशाला संपन्न करून प्रगति पथावर न्यायचे असेल तर सगळेच फुकट ही मानसिकता सोडा आणि अशी अफू देणाऱ्या व्यवस्थेला दूर करण्याचा निश्चय मी आज मनापासून करेल. सरकारने ही जीवनावश्यक वस्तू रास्त भावात द्यायलाच हव्यात....


अन्न फुकट पाहीजे...ते खाण्यासाठी पैसे नाहीत, ते सरकारने द्यावे...किमान आपण राहत असलेल्या आपल्या घराचे १०० Units चे लाईट बिल तरी भरायला हवे...ते भरण्यासाठी सुद्धा पैसे नाहीत....ते सुद्धा सरकारने भरावे...मग आपन जन्म कशासाठी घेतला आहे...??आपल्या पेक्षा मग पशु-पक्षी बरे...लाॕकडाऊनमध्ये प्राणी-पक्षांना सरकारने काय मोफत दिले...?? तरी त्यांनी चारा शोधलाच ना...!! ते जिवन जगलेच ना...


आणि आपण मनुष्य जन्माला आलो आहोत...कशासाठी...?? अशी अवस्था आज आपल्या देशात आहे...ईतर देशात कुठेही नाही...


मोबाईल, राजकारण, अतिरंजित मीडिया, जात या विळख्यातून मुक्त होण्यासाठी धड़पडणाऱ्या तरुणाईला ही फुकटची अफू निर्बल निष्क्रिय करण्याचा धोका होतो....


आणि मग यातूनच मग आपल्या संतानी म्हटल्या प्रमाणे 'रिकामे मन, सैतानाचे घर' यानुसार  दुराचार बलात्कार, व्याभिचार, लुटमार वाढतात व राष्ट्राचे प्रगतीऐवजी यातून नुकसानच जास्त होते...


"आत्ताचे आपल्या पीढीचे सोडा हो...!! पन आपल्या येणाऱ्या पुढच्या पिढीचा सगळ्यांनी नक्कीच  विचार करा..."



----------Whatsaap Collection ----------

Thursday, 20 May 2021

शिक्षक आणि टवाळखोर पानवाला...........

 टवाळखोर पानवाला  एका शिक्षकाला नेहमी नेहमी टोमणे मारायचा, म्हणायचा,

"शिक्षकांना काम कमी आहे आणि पगार जास्त" 


एक दिवस शिक्षकाची सटकली. 

तो म्हणाला - "एक पान किती रूपयाला आहे ?"


पानवाला म्हणाला, "10 रुपयाचे."


 शिक्षक - ठीक आहे. आजपासुन याच पानाचे मी तुला 20 रु. देतो.


फक्त काही *नियम* पाळावे लागतील. 

हे घे रजिस्टर, यात प्रत्येक पानाची माहिती लिहायची.


*उदा :-*


1. हे पान कोणत्या झाडाचे आहे?

2. ते झाड़ कोणत्या शेतात आहे?

3. त्याची  पाने  केंव्हा तोेडली?

4. त्याची तारीख, तुझ्या दुकानात आणल्याची तारीख?

5. या पानात जे जे टाकले त्या कात, चुना, सुपारी, इ. पदार्थांची माहिती ? मला लेखी स्वरुपात द्यायची.

6. त्यावर तुझी सही करायची. 

7. माझी सही घ्यायची.

8. माझ्या हेडमास्तरची सही घ्यायची.

9. पान खाण्यापूर्वीचे माझे वर्णन.

10. पान खाल्ल्यानंतर ची माझी स्थिती.

11. येणार्या प्रत्येक माणसाची लेखी नोंद ठेवायची ,

12. प्रत्येक माणसाची मस्टर वर सही घ्यायची.

13. नवीन गिर्हाइक आले तर त्याचा अँडमिशन  फॉर्म भरून घ्यायचा.

14. प्रत्येक गिर्हाइकाला मार्गदर्शन व समुपदेशन करायचे,

15. वाईट वागला तर शिक्षा करायची.

16. रोज आला तर कौतुक करायचं.

17. येत नसेल तर प्रबोधन करायचे.

18. पानपट्टी बंद केल्यावर गिर्हाइक शोधत फिरायचे.

19. सरकारची मोहीम आली की त्याच्या नोंदी करायच्या.

20. गावातील लोकसंख्या मोजायची .

21. पान खाणारे आणि न खाणारे शोधायचे.

22. ही सर्व माहिती लिहायची

आणि

23. नंतर ती मी सांगतो त्या software वर entry करायची.

24. सदरचा आढावा घेतला असता काही त्रुटी आढळल्यास त्याच्या परिणामाची जबाबदारी तुझी राहील.


इतके सांगेपर्यंत तो पानवाला चक्कर येऊन बेशुद्ध होऊन पडला होता. . .


🇮🇳  *शिक्षकांसोबत पंगा घ्यायचा नाही.👊🏻*


कारण त्यांना जो पगार मिळतो तो 

शिक्षणाचा,कामाचा व अतिशय ताणतणावाचा

आणि

सर्वात महत्वाचे

वरिष्ठांना सहन करण्याचा असतो......

😜😀


*तात्पर्य :-*

"पगार किती आहे ? शिक्षण किती आहे? 

 ह्यापेक्षा कामाचे स्वरूप कसे आहे ?

कोणत्या परिस्थितीत

 काय काम करावे लागते?

याचा देखील विचार करावा

आणि मगच बोलावे"

.*Dedicate to all Teachers*

======== Whatsaap Collection ========

Wednesday, 19 May 2021

श्रद्धा म्हणेचच विश्वास.

विधिलिखित


 खरी अंधश्रद्धा कोणती?


फुले, शाहू, आंबेडकर यांनी शिवरायांना मानले,

शिवरायांनी संत तुकारामाना मानले,

संत तुकाराम महाराज यानी विठ्ठल-पांडुरंगाला मानले,

पांडुरंग दगडाचा देव, त्या मुर्तीला पूजतो मी.


दगडाला देव मानणारा आस्तिक आहे मी.


माझ्या घामाचेच पैसे दानपेटीत टाकतो मी.

का?

--अन्नदान होते.

--दवाखाना चालतो.

--शिक्षण संस्था चालते.

--परिसराचा विकास होतो.

आणि हो...

-देव/मंदिर फक्त भटजीसाठी नसतात.

-- मुर्तीकार,

-- फुलझाडे लावणारा शेतकरी,

-- फुले विकणारा माळी,

-- बेल आणणारा मजूर,

-- बेल विकणारा गुरव,

-- नारळ, प्रसाद विकणारा दुकानदार,

-- हॉटेल चालक,

-- स्टेशनवरून भक्तांना मंदिरापाशी आणणारा रिक्षा चालक,

-- मंदिर बांधणारे ईंजिनिअर, गवंडी, मजुर,


हे सर्वजण काही भटजी नसतात पण या सर्वांचा चरितार्थ या देवावरच चालतो.


म्हणून सांगतो, या सर्वात देवत्व शोधणारा माणूस आहे मी.


दगडाला देव मानणारा आस्तिक आहे मी.


दानपेटी घेऊन फिरत नाही दारोदारी.

"पूजा करा... पूजा..." म्हणत भटजीही फिरत नाही घरोघरी.

अभिषेक करताना देतो ज्ञानाचीच शिदोरी.


कशी?


-तो सूर्याला देवता मानतो,

-तो पाण्याला देवता मानतो,

-तो भूमिला देवता मानतो,

-तो अग्नीला देवता मानतो,

-तो वायूला देवता मानतो,


अभिषेक म्हणजे काय करतो?

पंचभूताना देवता मानतो, पर्यावरणाचे स्मरण करतो.


पंचप्राणालाच देव मानणारा आहे मी.

निसर्गात देवत्व जाणणारा आस्तिक आहे मी.


अंधश्रद्धेला थारा नाही, श्रद्धाच जपतो मी.


जादूटोणा, चमत्कार, बुवाबाजीला फटकारतो मी.

दगडाच्या देवापुढे झुकणारा आस्तिक आहे मी.


तो दगडाचा देव वसतो नदीच्या किनारी, सागराच्या तीरावर, गिरी पर्वतावर अथवा खोल दरीत.


अशा स्थळी भेट देणारा निसर्ग प्रेमी आहे मी.

दगडाला देव मानणारा आस्तिक आहे मी.


निंरतर अंधश्रद्धा हा शब्द केवळ धार्मिक बाबतीतच लावला.

हे त्यांचे स्वार्थ म्हणावा का अज्ञान?

कोणीही उठायाच आणि आध्यात्मिक, धार्मिक गोष्टीला अंधश्रद्धा म्हणावे.

हे सर्व काय आपल्या भारतीय संतापेक्षा ग्रेट आहेत का?


नाही... मुळीच नाही.


स्वतःला विज्ञानवादी म्हणून घेणारे लोकच अंधश्रद्धेला बळी पडले आहेत.


विज्ञानाचा आधार घ्यावा पण अध्यात्माला नांवे ठेऊन नव्हे.

विज्ञान अध्यात्माचा बोट धरून चालले आहे.


प्रथम श्रद्धा म्हणजे काय?

श्रद्धा म्हणेचच विश्वास.

Tuesday, 18 May 2021

*हमारा भी एक 'जमाना' था .....*



पाचव्या इयत्तेपर्यंत पाटीवरची लेखणी जिभेने चाटत *कॅल्शियमची* कमतरता भरून काढायची आमची जन्मजात सवय होती.


अभ्यासाचं टेन्शन आम्ही पेन्सिलीचं मागचं टोक *चावून* झेललं होतं...


पास / नापास हेच आम्हाला  कळत होतं... % चा आमचा संबंध कधीच नव्हता.


शिकवणी लावली, हे सांगायला लाज वाटायची.... कारण  "ढ" असं हीणवलं जायचं...


पुस्तकामध्ये *झाडाची पानं* आणि *मोरपिस* ठेवून आम्ही हुशार होऊ शकतो, असा आमचा *दृढ* विश्वास होता...


कापडाच्या पिशवीत पुस्तकं आणि वह्या रचण्याचा *शिरस्ता* हे आमचं एक निर्मितीकौशल्य होतं...


दरवर्षी जेव्हा नव्या इयत्तेचं दप्तर भरायचो त्याआधी, पुस्तकं आणि वह्यांना कव्हर्स घालणे, हा आमच्या जीवनातला एक *वार्षिक उत्सव* असायचा...


आई वडिलांना आमच्या शिक्षणाची फारशी *फिकीर* नव्हती आणि ना ही आमचे शिक्षण त्यांच्यावर फारसा *बोजा* होते. वर्षानुवर्षं आमच्या आईवडिलांची पावलं कधी आमच्या *शाळेकडे* वळत नव्हती...


एका मित्राला सायकलच्या पुढच्या *दांड्यावर* व दुसऱ्याला मागच्या *carrier* वर बसवून, आम्ही रस्तोरस्ती किती फिरलो हे आता आठवतही नाही... बस्सं!......काही *धूसर* आठवणी उरल्यात इतकंच.......!!


शाळेत मार खाताना आणि पायांचे अंगठे धरुन उभं राहताना आमचा *'ईगो'* कधीही आडवा येत नव्हता, खरं तर आम्हाला *'ईगो'* काय असतो हेच माहीत नव्हतं...


मार खाणं, ही आमच्या *दैनंदिन* जीवनातील एक सामान्य प्रक्रिया होती. *मारणारा आणि मार खाणारा दोघेही खुष असायचे.* मार खाणारा यासाठी की, 'चला, कालच्यापेक्षा तरी आज कमी *धोपटला* गेलो म्हणून आणि मारणारा आज पुन्हा *हात धुवून* घ्यायला मिळाले म्हणून......


आम्ही आमच्या आईवडिलांना कधी सांगूच शकलो नाही की, आम्ही *तुमच्यावर किती प्रेम करतो,* कारण आम्हाला *'आय लव यू'* म्हणणं माहीतच नव्हतं...


आज आम्ही असंख्य टक्के टोमणे खात, संघर्ष करत *दुनियेचा एक हिस्सा झालोय.* काहींना जे हवं होतं, ते त्यांनी *मिळवलंय* तर काही 'काय माहीत....? कुठे हरवलेत ते...!


आम्ही जगात कुठेही असू पण हे *सत्य* आहे की, आम्ही *वास्तव दुनियेत जगलो,* आणि *वास्तवात* वाढलो.


कपड्यांना *सुरकुत्या* पडू न देणं आणि नात्यांमध्ये *औपचारिकता जपणं* आम्हाला कधी जमलंच नाही. त्या बाबतीत आम्ही *मूर्खच* राहिलो.


आपल्या *नशिबाला* कबूल करून आम्ही आजही *स्वप्नं* पहातोय. कदाचित ती स्वप्नच आम्हाला *जगायला मदत करतायत* नाहीतर जे जीवन आम्ही आतापर्यंत जगलोय त्याची *वर्तमानाशी* काहीच तुलना होणार नाही.


आम्ही चांगले असू किंवा वाईट, 


पण


*हमारा भी एक 'जमाना' था*......


*********     Whatsaap Collection     *********


Tuesday, 4 May 2021

कोरोनमुक्त झालेल्यांना लसीचा एकच डोज पुरेसा.

                  १७ एप्रिल ला प्रकाशित झालेल्यांना संशोधनावर जगात चर्चा सुरु झाली असून हि बातमी भारतासाठी अत्यंत महत्वाची आणि मोठी बातमी आहे. समोरच्या येणाऱ्या काळामध्ये एकच डोज पुरेसा होऊ शकतो का? हे पाहणे महत्वाचे आहे. डॉ. अरविंद देशमुख, मायक्रोबायॉलॉजिस्ट यांचे मते कोरोनाची लागण होऊन जे बरे झालेले आहेत. त्याच्या शरीरात बऱ्यापैकी अँटीबॉडीज तयार झालेल्या असून त्यांना दुसऱ्या लसीची आवश्यकता नाही. 

                       बघा युट्युब वरील त्यांचा हा व्हिडिओ  (ABP MAZA )

व्हिडीओ बघण्यासाठी समोर क्लीक करा. - Clik Here 

*कोविड वैक्सीन लगवाने वाले कृपया ध्यान दे!!!!*

 सावधान

कोविड वैक्सीन लगवाने वाले कृपया ध्यान दे!!!!

कल  अशोकनगर में  एक  आदमी  कोविड वैक्सीन लगवा कर जब घर आ रहे थे तो उनको धुँधला दिखाई देने लगा। घर पहुचते पहुचते वह अत्यधिक घबरा गए और तुरंत वैक्सीन सेंटर पर फोन करके अपनी परेशानी के बारे में बताया। 

वैक्सीन सेंटर से कहा गया कि आप तुरंत वापस आइये। क्योंकि आपके जाते ही आपको वैक्सीन लगाने वाली नर्स को भी धुधला दिखना शुरू हो गया है।  वह वापस वैक्सीन सेंटर पहुंचे तो डॉ ने उन्हें चश्मा देते हुए कहा कि यह अपना चश्मा लीजिये और नर्स का चश्मा जो आप पहन कर चले गए थे वापस कीजिये। 


हँसते रहें मुस्कुराते रहें और ज़्यादा दिमाग न लगाए

, वैक्सीन ज़रूर लगवाए 🙏

Thursday, 29 April 2021

कोरोना.

 डॉ.सुधीर क्षीरसागर        9822094196

 एम.बी.बी.एस.(पुणे), डी.ए.(औरंगाबाद)

 रजी.नं 58329

            

घाबरू नका..


प्रत्येक ताप सर्दी खोकला हा कोरोना नसतो..


कुठल्याही व्हायरल इन्फेक्शनमध्ये कोरोना टेस्ट पॉझिटिव्ह येवू शकते..


कोरोना ..९९% बरा होतो.


कोणत्याही डॉक्टरांकडे जाण्यापुर्वी हा औषधौपचार कमीत कमी पाच दिवस नक्की घ्या.


संशयित कोरोनाचा उपचार घरीच करा..


ताप-/अंगदुखी

Tab Calpol 500 

(स...दु...सं.)


सर्दी-

Tab Triz/Tab Levocet m 

(स‌‌....संध्याकाळ)


खोकला-

Tab Azee 500 

(रोज 1)  आणि

Sy.Grilinctus BM 10 मिली.

(स--- दु--- सं)


जुलाब..

Tab O2        

(स....सं)  आणि

Tab Ocid 20 

(स....सं) 

ORS Powder.

दिवसभर हवे तितके


उलटी मळमळ

Tab.Acilok RD 

      +स...संध्या)..

         किंवा

Tab Emcet 4mg 

जेवणापुर्वी एक ते दोन तास

सर्वांनी पाणी,पातळ पदार्थ भरपुर घ्या

------------------------- ०

खालील औषधे आजारी नसले तरी घ्या

Tab Limcee रोज १  (Vit C) 

लिंबू, संत्री

Tab Arovit.  रोज १ (Vit  A) 

गाजर, शेवगा

Tab Evoion रोज:१. (Vit E)

बदाम, शेंगदाणे


लहान मुलांच्या औषधौपचाराचे प्रमाणा साठी 

फोन करा...विनामुल्य सेवा

------------------------- ०

आपली नियमित चालू असलेली औषधे बंद करू नका !

---० आहारात 'क' जीवनसत्वयुक्त

---० पदार्थ भरपुर घ्या..

---० नियमित.. पौष्टिक अन्न !

---० नियमित..सलाग व्यायाम !

       (चालणे सर्वात उत्तम)

---० नियमित..पुरेशी झोप !

---० नियमित..आनंदी रहा !

---० नियमित..हसत रहा !

------------------------- ०

 उगीचच मोठ्या हॉस्पीटल्स,  मध्ये अॕडमिट होऊन खिशाला कात्री लावून नका...

------------------------ ०

लक्षात ठेवा...

कोणाकडे ही *जादूची कांडी नाही..

छोट्या आणि मोठ्या रुग्णालयांत एकाच प्रकारचा आणि सारखाच औषधौपचार केला जातो...

कोरोना टेस्ट कधीही आणि वारंवार सुध्दा पॉझिटिव्ह येवू शकते. 

------------------------- ०

लक्षात घ्या..

आजपर्यंत एकही नेता,अभिनेता, उद्योगपती, क्रिकेटपटू  किंवा व्ही.आय.पी. कोरोनाने मृत्यूमुखी पडला नाही...*

याचे कारण त्यांनी *मोठ्या हॉस्पिटलमध्ये इलाज केला म्हणून नाही तर "कोरोना" हा सौम्य आजार आहे म्हणून ते बरे झाले आहेत!


तुमच्या अज्ञानाचा आणि घाबरलेल्या मनस्थितीचा गैरफायदा घेवून तुम्हाला लुटले जाऊ शकते..


तेव्हा सावध व्हा!


१)डॉ‌.निलेश पाटील

२)डॉ.पल्लवी पाटील

३)डॉ.संग्राम पाटील.

४)श्री.संदिप माहेश्वरी 

यांच्या कोरोना सबंधित पोस्ट नक्की पहा..ऐका!

पाच दिवसांनंतर..बरे वाटले नाही किंवा खालील त्रास वाढला तरच..


जास्त ताप..

श्वासोश्वासास भयंकर त्रास होत असल्यास,

दम खुपच लागत असल्यास..

प्रचंड खोकला येत असल्यास..


इतर छातीचे आजार नसल्याची खात्री करणे ताप येणारे आजार नसल्याची खात्री करणे

नंतरच सरकारी दवाखान्याची संपर्क करा...

                  

नियमित..माणूसकी जपा! 

आपल्या सर्वांना आरोग्यदायी जीवनासाठी हार्दिक मंगलमय शुभेच्छा...

🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹

आपलाच मित्र,

डॉ.सुधीर क्षीरसागर


कृपया ही पोस्ट आपली मित्र-मंडळी, स्नेही, परिवार आणि हितशत्रू यांना सुध्दा शेअर करा...

************

 कोरोना झाल्यावर काय कराल ?


सर्व प्रथम जाणून घ्या जर सर्दी झाली असेल आणि तुमचा mucous (शेम्बूड) पांढरा वाहत असेल तर अजून काही विपरीत परिणाम नाहीये.


जर mucous चा रंग पिवळा किंवा हिरवा असेल तर तुम्हाला अँटिबायोटिक्स ची नितांत गरज आहे आणि अशा अवस्थेत तुम्ही टेस्टिंग ला गेलात तर १००% तुमची टेस्ट POSITIVE येणार.


RTPCR टेस्टचा निकाल दोन दिवसांनी मिळतो आणि RTPCR टेस्टचा निकाल  तुम्ही जलद सुद्धा करू शकता त्यानुसार तुम्हाला त्वरित कळेल की तुम्ही POSITIVE आहात की NEGATIVE आहात. 


जर तुम्ही POSITIVE झाले असाल तर सर्वात प्रथम हे लक्षात घ्या की तुम्ही जगातील सर्वात " फुसक्या "आजाराला बळी पडला आहात.  ह्याचा इलाज जर तुम्ही सरकारी दवाखान्यातून केला तर तुम्ही विनाखर्च १००% बरे होणार आहात. 


आपल्याकडे पैशांची कमतरता नाही, म्हणून या फुसक्या आजारावरील इलाजासाठी जर आपण  खाजगी रुग्णालयात गेलात तर मात्र तुमची खैर नाही. ह्याचे कारण पुढीलप्रमाणे -


(०१) 

खाजगी रुग्णालयात गेल्यावर तुम्हाला सर्दी व ताप नियंत्रणात आणण्यासाठी गोळ्या औषधे आणि सलाईन दिले जातील. 


(०२)

सरकारी रिपोर्ट वर भरोसा नाही म्हणून पुन्हा RTPCR करण्यास भाग पाडतील त्यामुळे दोन दिवसांचे बेड चार्जेस वाढतीलच शिवाय RTPCR  रिपोर्टसाठी रुपये ८०० द्यावे लागतील . 


(०३)

रिपोर्ट प्राप्त झाल्यावर RTPCR चिकित्सेनुसार स्कोर जास्त आसल्याचे आपणास सांगून,  विषाणू किती खोलवर गेला हे समजण्यासाठी HTRSCAN टेस्ट करवून घेण्याचा निर्णय घेण्यात येईला व त्यासाठी येणारा कमीत कमी खर्च म्हणजे HTRSCAN टेस्टसाठी  रुपये २५०० आणि ऍम्ब्युलन्स किमान खर्च रुपये १०००/- ते ३०००/-.


(०४)

या चिकित्सेनंतरच तुमच्यावर  इलाज सूरू करण्यात  येतील. सर्दी नियंत्रणासाठी कांही गोळ्या देण्यात येतील, तापासाठी काही वेळ्या गोळ्या देण्यात येतील, सांधे दुखत असल्यास व्हिटॅमिन डी३ च्या गोळ्या देण्यात येतील आणि चव आणि वास गेला असल्यास व्हिटॅमिन "क" च्या गोळ्या देण्यात येतील.  वैध्यक शास्त्रानुसार याला उपचार समजले जात नाही.


(०५)

कांही दिवसानंतर  तुम्हाला FABIFLUE 800 MG च्या गोळ्यांचा कोर्स चालू करण्यात येईल.    ह्या FORTE प्रकारातील गोळ्यांची किंमत रूपये २५६० रुपये. एवढ्या महाग गोळ्या घेतल्यामुळे "कोरोना " या आजाराच्या भयानक तिव्रतेबाबत  तुमची मानसीक खात्री होईलच आणि या १५ दिवसांच्या उपचारानंतर तुम्हाला घरी पाठविण्यात  येते. या पंधरा दिवासांत तूमच्या खिशांतून राजरोसपणे किमान रुपये ३,००,००० लुटण्यात येतात. 


(०६)

किमान पंधरा दिवस वैध्यकिय सल्यानुसार  नियमितपणे FABIFLUE 800 MG  पॉवरच्या गोळ्या तुम्ही शरीरात ढकलत असल्यामुळे, आपल्या एक गोष्ट लक्षात  येत नाही की भविष्यांत ह्याचा काही विपरीत परिणाम आपल्या शरीरावार होणार आहे का ?. झालाच तर तो आपल्या शरीराच्या कुठल्या भागावर होईन हे भविष्यात कळेलच. 


(०७)

कोरोना वैध्यकिय उपचारांमुळे तुम्ही भावनिक होऊन डॉक्टरला हाथ जोडाल आणि तुम्हाला वाटेल त्यांच्या प्रयत्नामुळेच तुम्हाला जीवदान मिळाले. परंतु असे काही नाही त्याने पक्के तुम्हाला वेड्यात काढून तुमचे खिसे रिकामे केलेले असतील. 


मित्रांनो, सांगायची गम्मत अशी की ज्या FORTE प्रकारातील गोळ्या ही धुरंदर मंडळी तुम्हाला देत आहे त्याचा निर्माता आहे GLENPHARMA कंपनी. या औषधी गोळ्यां शरीरातील INFECTION दूर करण्या करिता ह्या गोळ्या बनविलेल्या आहेत बाकी काही नाही.


आपण जे म्हणतो की कोरोना वर इलाज नाही त्यावर हा उपाय एकदम बरोबर बसत आहे. त्यामुळे लोक बरे होत आहे.  


आपल्या हातात १० ते २० हजार रुपये किमतीचा महागडा फोन असून देखील आपण GOOGLE वर काही खात्री करून घेत नाही, ही सर्वात मोठी तुमची चूक म्हणावी लागेल. 


सरकारी दवाखान्यात ह्या महागड्या गोळ्या अजिबात दिल्या जात नाही किंवा कुठल्याही प्रकारचा HTRSCAN ही काढण्यास सांगण्यात येत नाही.


सरकारी  दिल्या जातात त्या फक्त DOXY 1 - LDR च्या गोळ्या. या औषधी गोळ्या जर आपण स्वत: बाहेरून खरेदी केल्यात तर ह्याचे अवघे पाकीट ९५ रुपयांना मिळते आणि रोजच्या जेवणानंतर दोन गोळ्या अशा प्रकारे नियमितपणे पाच दिवस गोळ्या घेतल्यास तुमचा कोरोना कुठाल्या कुठे निघून जातो हे  कळत देखील नाही. आणि तुम्ही अगदी ठणठणीत होऊन  फिरण्यास मोकळे.


आता तुम्ही ठरवा खाजगी इलाज ३,००,०००/- रुपयांचा की सरकारी  रू. ९५/- चा इलाज ?   


[ टिप - दोन्ही गोळ्यांच्या संदर्भात तुम्ही GOOGLE वर माहिती जाणून घेऊ शकता. ]



************* Whatsaap Collection *************